*बिबट्याला पकडण्यात वनविभागाचे गौडबंगाल? पालकमंत्री व वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- अंगद देवकते*
*करमाळा तालुका प्रतिनिधी-अतुल वारे पाटील*
बिबट्याला पकडण्यात वनविभागाला आलेले अपयश पाहता यामागे काहीतरी गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत असून अनेक नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री व वनमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष अंगद देवकते यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले की करमाळा तालुक्यात गेली आठ दिवसापासून खेडोपाडी बिबट्याच्या दहशतीने घबराटीचे वातावरण आहे.वनविभागाने व पालकमंत्र्यांनी दोनच दिवसांत बिबट्याला गोळ्या घालू.जेरबंद करू असे आदेश माध्यमांशी बोलताना दिले. परंतु अद्याप ही बिबट्याला ना जेरबंद केले ना गोळी लागली.यामागे काहीतरी गौडबंगाल असण्याची शक्यता आहे.बिबट्या आजून एक जीवघेणा हल्ला करण्याची वाट वनविभाग पाहते काय?
उजनी भागासह जनावरे दावनीला,शेतीला पाणी देणे,उसतोड,तुर काढणी, शेतीची कामे खोळंबली आहेत.शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण?शेतकऱ्यामध्ये भितीचे वातावरण आहे. नरभकक्षक बिबट्या च्या हल्ल्याने तीन जनांना आपला जिव गमवावा लागला.अद्यापर्पत वनविभागला अपयश आलेले आहे.बिबट्याला मारण्यासाठी पिंजरे,ड्रोन कॅमेरा,श्वान पथक,शाॅर्प शुटर,बेशुध्द पथक,राज्य राखीव दलाची एक तूकडी,16वनविभागाची पथके,गावकर्यांचे सहकार्य ऐवढे असताना बिबट्या तबल चार वेळा कसा पसार होतो.याचा विचार सर्वसामान्य माणूस करत आहे.वनविभागाचे अधिकारी व पालकमंत्री दत्तात्रय भरणे ,वनमंत्री यांनी बिबट्याला पकडण्यासाठी आलेले अपयशाची तसेच निष्पाप नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी रासपचे तालुकाध्यक्ष अंगद देवकते यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा