*स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेहमी शेतकरी हिताला प्राधान्य दिले- सुदर्शन शेळके*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेहमी नात्यापेक्षा शेतकरी हिताला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला असून भविष्यातही शेतकरी हितासाठीच संघटना कटिबद्ध असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी दिली. सदर प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की एका दैनिकामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना नातेवाइकांचे प्रश्न घेऊन आंदोलन करत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती, हे वृत्त साफ खोटे असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन करून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले नसते तर आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असलेला बाजार भाव मिळाला नसता. काही लोक जाणून-बुजून स्वाभिमानी शेतकरी संघटने बद्दल अफवा पसरत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. भविष्यकाळात जो कोणी शेतकरी हिताच्या आड येईल त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी युवा तालुका अध्यक्ष अमोल घुमरे तालुका उपाध्यक्ष तानाजी राजे शिंदे दीपक शिंदे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा