Breaking

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

समाजकारणाला राजकारणाची जोड शिवधर्म फाऊंडेशन पहिल्यांदाच लढवणार ग्रामपंचायत निवडणूक..दिपकअण्णा काटे*




*समाजकारणाला राजकारणाची जोड शिवधर्म फाऊंडेशन पहिल्यांदाच लढवणार ग्रामपंचायत निवडणूक..दिपकअण्णा  काटे*

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार

*राज्यात तसेच इंदापुर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निवडणुक निकालानंतर घोषीत करण्यात येणार आहे.*            
*ग्रामपंचायत निवडणूकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून ग्रामपंचायत निवडणुकीत ऐन थंडीच्या दिवसात  ग्रामीण भागात चांगलेच वातावरण तापलेले पाहायला मिळतेय.इंदापुर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विधानसभेनंतर पुन्हा एकदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व भाजपचे नेते माजीमंञी हर्षवर्धन पाटील हे आपले आस्तित्व सिध्द करण्यासाठी पुन्हा एकदा ऐकमेंकाच्या विरोधात आमनेसामने असणार आहेत.*

*ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक फाँर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी शासकीय कार्यलयामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठी धावपळ चाललेली पाहायला मिळतेय. गावपातळीवर देखील ग्रामपंचायत निवडणुकीत पँनल उभा करण्यासाठी विविध पक्षाच्या वतीने घोंगडी बैठका, मतदार गाठीभेटीचे कार्यक्रम जोमाने सुरू आहेत. विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे अहोरात्र ग्रामपंचायत निवडणूक पँनल मोर्चे बांधणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. राज्यात तसेच   इंदापुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पहिल्यांदाच शिवधर्म फाऊंडेशन ने ग्रामपंचायत निवडणुकीत समाजकारणाला राजकारणाची जोड म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय कार्यकर्तांच्या व विश्र्वासु सहकार्‍यांच्या अग्रहाखातर घेतला आहे, अशी माहिती शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पै. दिपक काटे यांनी दिली आहे.*शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपकअण्णा काटे यांनी  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याची जोरदार चाचपणी सध्या सुरू केली आहे. शिवधर्म फाऊंडेशनचे संपूर्ण महाराष्ट्रात नवयुवकांचे मोठ्या प्रमाण जाळे अाहे. शिवधर्म फाऊंडेशन संघटनेने अनेक मोठ मोठे सामाजिक उपक्रम राबिवले असून संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठे नेटवर्क तयार करण्यात आले आहे.संभाजी विडीवरील संभाजी महाराज यांचे नाव बदलण्यात यावे यासाठी शिवधर्म फाऊंडेशनच्या वतीने व्यापक असा लढा उभा केला गेला. त्यानंतर शेवटी संभाजी विडीवरील नांव साबळे -वाघिरे कंपनीला बदलण्यास भाग पाडले. इंदापुर सेतू मधील भोंगळ कारभारा विरोधात शिवधर्म फांऊंडेशनच्या वतीने मोठे आंदोलन करुन सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवुन दिला. व जादा व बोगस पैसे घेणे बंद केले. 

*शिवधर्म फाऊंडेशने इंदापुर तालुक्यात दोनच दिवसात ५१ शाखाचे ओपनिंग केल्या आहेत .प्रत्येक गावागावात शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी बुथ बांधणी मजबूत करीत आहेत. परंतु समाजकारणाला राजकारणाची जोड म्हणून शिवधर्म फाऊंडेशनच्या वतीने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला  आहे.त्यामुळे भविष्यात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवधर्म फाऊंडेशनची सरपंच निवडीसाठी भुमिका मोठी निर्णायक ठरणार आहे.*.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा