*करवंदी मध्ये श्री. गायत्री हनुमान ग्रामविकास पॅनल चा 7 पैकी 5 जागा जिकूंन दणदणीत विजय. माजी सभापती च्या पॅनल ला फक्त 1 जागा जिंकता आली तर 1 अपक्ष.*
*लातूर जिल्हा प्रतिनिधी /जीवन भोसले*
*लातूर* (ता.उदगीर)करवंदी मध्ये ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रा. दयानंद भाऊराव जाधव यांचे प्रयत्न झाले, माजी सभापती गंभीरे गटाला त्यांनी खूप विनंती केली पण त्यात काही गंभीरे गटाकडून काहीही पॉसिटीव्ह प्रतिक्रिया आली नाही.
प्रा. दयानंद जाधव यांनी विजयकुमार चव्हाण, सुग्रीव सूर्यवंशी, मारोती नरवटे, भालेराव जाधव, उमेश बेलुरे आणि मोहन बिरादार यांना एकत्र करून श्री. गायत्री हनुमान ग्रामविकास पॅनल गंभीरे गटाच्या विरोधी पॅनल उभे केले.
जाधव गट आणि गंभीरे गट यात खूप चूरशीची लढत पाहायला मिळाली.
गावाच्या विकासाचे मुद्दे पटवून देण्यात जाधव गटाला यश आले व माजी सभापती कडे कोणतेच विकासाचे मुद्दे नसल्यामुळे प्रचाराच्या शेवटी शेवटी सगळा कल गायत्री हनुमान पॅनल कडे वळला आणि गंभीरे गटाला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले.
जाधव गटाच्या पॅनल ला 7 पैकी 5 जागेवर विकासासाठी गावाच्या जनतेने भरभरून साथ दिली व एकतर्फी जिकूंन दिले. आणि माजी सभापती च्या पॅनल चा धुव्वा उडवला आणि त्यांना फक्त एक जागेवर समाधान मानावे लागले.
गायत्री हनुमान चे विजयी उमेदवार, विनायक गायकवाड, रमाबाई सूर्यवंशी, कौशल्या जाधव, शाहू चव्हाण आणि शालूबाई नरवटे हे आहेत.
गंभीरे गटाकडून एक सत्यवान बिरादार आणि एक अपक्ष रेखा बावगे या निवडून आल्या आहेत.
लोकांनी, लोकांच्याकरिता, लोकांसाठी, गायत्री हनुमान पॅनल म्हणजे विकासाला मत देऊन खऱ्या अर्थाने लोकशाहीचा सम्मान राखला अशी खमंग चर्चा उदगीर तालुक्यात आणि पंचक्रोशीत पाहायला मिळत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा