Breaking

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

करमाळा येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे धरणे आंदोलन*

करमाळा येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे धरणे आंदोलन*

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे त्वरित मागे घेण्याच्या मागणीसाठी करमाळा येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती च्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले .
     यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे  दशरथ कांबळे ,समाजवादी नेत्या ऍड सविता शिंदे ,डॉ अमोल दुरंदे ,बामसेफचे गजानन ननवरे, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, तालुकाध्यक्ष अमित घोगरे, जिल्हा संघटक गणेश सव्वाशे, गण प्रमुख जालिंदर माने, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक शिंदे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे ,तालुका पक्षप्रमुख बापू फरतडे, बहुजन क्रांती मोर्चा चे रामचंद्र पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे ,राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या पूजा झोळे आदी उपस्थित होते.
      यावेळी बोलताना दशरथ कांबळे यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडकडून टीका केली. दशरथ कांबळे म्हणाले की, केंद्र सरकारने पारित केलेले कायदे शेतकरीविरोधी आहेत. शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी नुकसान करणारे आहेत, शिवाय हे कायदे बड्या उद्योगपतींच्या हितासाठीच बनवले गेलेले आहेत. या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलन सरकार दडपण्याचा प्रयत्न करत आहे. समस्त शेतकरी वर्गातून या कायद्याला विरोध होत असताना सरकार कोणाच्या फायद्यासाठी हे कायदे आणण्याचा घाट घालत आहे ,असा सवाल त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांनी आता जागे होण्याची वेळ आली असून या कायद्ये लागू केल्यास   शेतकरी अनेक पिढया गुलामगिरी मध्ये टाकल्या जाण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत सरकारच्या या जुलमी   कायद्याची जनजागृती करून लढा आणखी तीव्र केला जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.सरकारने त्वरित कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली .आंदोलनस्थळी ऍड रोहित घोगरे, ऍड योगेश शिंपी, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा नलिनी जाधव ,विजया कर्णवर ,शालन शिंदे ,पोपट भोसले ,सुनील भोसले, बहुजन संघर्ष समितीचे राजाभाऊ कदम ,पत्रकार विवेक येवले ,दादासाहेब लबडे ,मोझेस असादे ,कल्याण दुरंदे, स्वप्निल मोडके, मधुकर मिसाळ, मांजरगावचे सरपंच महेश कुमार कुलकर्णी, किसन बळवंत, दिलीप गायकवाड, महेंद्र शिंदे, औदुंबर मोरे ,बापू कोकरे, प्रकाश झेंडे ,चंद्रकांत काळे, आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.
 विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा