Breaking

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

लोकमंगल फाऊंडेशन तर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन.२५ एप्रिल २०२१ रोजी गोरज मुहूर्तावर बांधणार रेशिमगाठी*



*लोकमंगल फाऊंडेशन तर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन.२५ एप्रिल २०२१ रोजी गोरज मुहूर्तावर बांधणार रेशिमगाठी*  

तुळजापूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे उस्मानाबाद



तुळजापूर प्रतिनिधी :- लोकमंगल परिवारातील "लोकमंगल फाऊंडेशन" ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, अध्यात्म आधी अनेक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. लोकमंगल फाऊंडेशन तर्फे समाजातील सर्व स्तरावरील लोकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य निरंतर सुरू आहे. सोलापूर व पुणे येथे निराधार वृद्धांसाठी मोफत अन्नपूर्ण योजना सुरू आहे. या योजने मार्फत पाचशे निराधार ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळेचे जेवणाचे डबे मोफत घरपोच दिले जातात. समाजातील सर्व स्तरातील जनतेला सामाजिक उपक्रमातून एकत्रित आणून समाजात बंधुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न लोकमंगल फाऊंडेशन करीत आहे.
       "विवाह" हा एक जीवनातील महत्त्वाचा टप्पा तो पार करत असताना समाजातील सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विवाह वेळी येणाऱ्या अडचणी नाहक होणाऱ्या पैशांची उधळण, जाचक हुंडापद्धती, मनुष्यबळाची अडचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टींचा विचार करून मा. श्री. रोहनजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ९ वर्ष लोकमंगल फाऊंडेशन च्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करीत आहोत. आज पर्यंत सोलापूर व उस्मानाबाद मध्ये गेल्या १६ वर्षापासून एकूण २९७७ जोडपी लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाली आहेत आत्ता लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याला चळवळीचे रूप येत आहे. लोकांना ही कल्पना आवडली आहे. कर्ज काढून विवाह करणे मनुष्यबळाच्या अडचण, अनावश्यक खर्च, कर्जाची चिंता यावर तोडगा म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा होय. लोकमंगल फाऊंडेशन च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा रविवार दि.२५एप्रिल२०२१ रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर पार पडणार आहे. यंदाच्या सोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विवाह सोहळ्यासाठी तुळजापूर व उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील सर्व लोकमंगल मल्टीस्टेट च्या शाखांमध्ये माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
      या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाह ची कपडे हळदीची कपडे वराडी मंडळींच्या भोजनाची सोय मामानं करिता मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था वधूस मनी मंगळसूत्र व जोडवी देण्यात येतात. ताट वाटी ग्लास प्रत्येकी पाच नग बाळकृष्ण, स्टील, हंडा, डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य दिले जाते प्रत्येक जोडप्यास व्यवहार झाल्यानंतर विवाह सोहळ्याची आठवण म्हणून आकर्षक चित्रित केलेली सीडी दिली जाते वधू-वरांची उस्मानाबाद शहरातून वेगवेगळ्या मार्गावरून आकर्षक व भव्य अशी वरात काढली जाते. प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिला जातो. आज पर्यंत या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये बौद्ध१८२, मुस्लिम४८,खिस्ती५,हिंदू२६४४,जैन२ याप्रमाणे सर्वधर्मीय२८८१ असे एकूण लग्न लावण्यात आलेली आहेत.
  अशा सामुदायिक विवाह सोहळ्यात तून एकत्रित येण्याची भावना वाढीस लागेल समाजाच्या भावना संवेदना कल्पना या माध्यमातून समोर येतील व मदतीचा हात अधिक दृढ होईल म्हणूनच मा. श्री. रोहन देशमुख हे निरपेक्ष भावनेने हा उपक्रम गेली ९ वर्षे सातत्याने उस्मानाबाद जिल्ह्यात राबवत आहेत.
    तरी या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकमंगल फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी लोकमंगल फाऊंडेशनच्या कार्यालयात सुरू आहे.संपर्कासाठी पत्ता:- मा. श्री. रोहनजी देशमुख यांचे संपर्क कार्यालय, जुन्या बस स्टँड समोर, आय. सी. आय. सी. आय. बँकेच्या खाली, तुळजापूर.व लोकमंगल मल्टीस्टेट तीर्थकर कॉम्प्लेक्स, पोलीस लाईन समोर, आनंद नगर, उस्मानाबाद.मो. नं.९९२३८००२५६ नाव नोंदणीची अंतिम तारीख१०एप्रिल२०२१.      सोहळ्यामध्ये जपनार सामाजिक भान.
      उपस्थित वराडी मंडळीच्या आरोग्य साठी तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध असेल इच्छुकांना रक्तदान करण्यासाठी रक्तदान शिबिराचे स्वतंत्र दालन केले जाणार आहे. वऱ्हाडी मंडळींच्या मनोरंजनासाठी सामाजिक प्रबोधन करणारा संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. वधू-वरांचे भावी जीवन समाधान कारक व सुखी व्हावे यासाठी मान्यवर समुपदेशक व डॉक्टरांच्या मार्फत समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यांना सरकारी कन्यादान योजनेअंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी लोकमंगल फाऊंडेशन कडून विशेष प्रयत्न केले प्रयत्न केले जातात.लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या जोडप्यास त्यांच्या योग्यतेप्रमाणे लोकमंगल परीवारात नोकरी दिली जाते. याच बरोबर वधू-वरास कोणता व्यवसाय करायचा असेल तर विशेष बाब म्हणून कर्ज देखील मिळवून दिले जाते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा