Breaking

रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

का



*लातूर जिल्ह्यात अन्याची मालिका सुरूच,आणखी एक मातंग व्यक्तीचा खून.लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांची तत्काळ घटनास्थळी भेट*


 घडलेला प्रकार पाहाताच मातंग समाजावरील वाढलेल्या अन्यायाचा निषेध करत केली गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
लातूर जिल्ह्यात मातंग समाजावर सतत अन्याय होत आहेत.अन्यायाच्या विरोधात सर्व संघटना,पक्ष, नेते यांनी भेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचे सोमनाथ भाऊ कांबळे यांनी यावेळी केले आवाहन...

            सविस्तर वृत्त असे की,बामणी ता.निलंगा जि.लातूर येथे मागील भांडणाचा राग मनात ठेवून विनाकारण मातंग समाजातील एका व्यक्तीचा (दि.२०)रोजी खून  घडवून आणला. सदरील प्रकरणाची माहिती मिळताच लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन घडलेल्या सर्व प्रकरणाची माहिती जाणून घेऊन पोलिस प्रशासनाशी संपर्क केला आणि अन्यायग्रस्त कुटुंबाला धीर देत असंघटीत मातंग समाजातील सर्व घटकानि एकत्र येण्याची गरज असल्याचे निक्षून सांगितले.
   महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावर अन्यायाची सुरु असलेली मालिका दिवसें दिवस वाढताना दिसत आहे. जातीयवादी आणि अमानवीय घटनांमध्ये झालेली वाढ पाहता, पोलीस प्रशासन आणखीन तत्परतेने काम करण्याची गरज आहे. तसेच, मातंग समाजावर अन्याय कमी करण्यामध्ये हे सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. याची जबाबदारी घेत, गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी, मागणीही सोमनाथ भाऊ कांबळे यांनी केली. मागील किरकोळ वादाचा राग मनात धरून, एका होतकरू युवकाचा जाणीवपूर्वक खून घडवून आणला गेला. विकृत,जातीयवादी मानसिकतेचा लहुजी शक्ती सेने कडून जाहीरपणे निषेध नोंदवला.यावेळी सोमनाथ भाऊ कांबळे यांच्यासोबत लहुजी शक्ती सेना उस्मानाबाद को.क.जिल्हाध्यक्ष बालाजीभाऊ गायकवाड, अजय कांबळे हे होते. घटनास्थळी अगोदरच संघटनेचे मराठवाड्याचे युवक कार्याध्यक्ष बल्लीभाऊ(रणजित) कांबळे, लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष काशिनाथ दादा सगट, म.आ.जिल्हाध्यक्ष मायाताई लोंढे, शिवाजीभाऊ लोंढे, पिंटूभाऊ कांबळे, दत्ताभाऊ पुंड, सिद्धार्थ रसाळ आदी कार्यकर्ते निलंगा पोलीस स्टेशन येथे हजर होते.
सोमनाथभाऊ कांबळे यांनी अन्यायग्रस्त, पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर देत संघटना सर्वतोपरी आपल्या सोबत असल्याचे सांगितले.त्यानंतर लातूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मा.हिंमतराव जाधव यांच्याशी सर्व कार्यकर्त्यांसह भेट घेऊन घडलेल्या प्रकरणांमध्ये आपण स्वतः लक्ष घालावे. कुठलाही आरोपी सुटता कामा नये अशी विनंती केली. तसेच, लातूर जिल्ह्यामध्ये मातंग समाजावर वाढलेले अन्यायाचे प्रकरण लक्षात घेता. याकडे, पोलिस प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने, बघणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधले. मे. साहेबांनी कुठल्याही आरोपीला पाठीशी घालण्याचे काम होणार नाही. पोलीस प्रशासन अगदी या प्रकरणाची कसून चौकशी करून, सर्वच संबंधित आरोपींना योग्य त्या कलमासह न्यायालयापुढे हजर केले जाईल असे आश्वासक दिले.मयत जगन्नाथ शिंदे यांच्या अंत्यविधीसाठी बामणी यागावी  लहुजी शक्ती सेना, जिल्ह्यातून समाजातील कार्यकर्ते जमले होते. पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मोठा ताफा या ठिकाणी बंदोबस्तासाठी जमा झाला होता. गावामध्ये घडलेला खून, कार्यकर्त्यांची गर्दी, पोलिस प्रशासनाचा बंदोबस्त बघून, गावात तणावपूर्ण शांतता अत्यंत भयावह दिसत होती.पीडित कुटुंबाचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, मातंग समाजातील सर्वच कार्यकर्त्याचे, नेत्यांच्या संतापलेल्या आणि विचाराधीन नजरा हजारो प्रश्न घेऊन एकमेकांकडे पाहत होते.
अतिशय तणावपूर्ण वातावरणामध्ये आणि पोलीस बंदोबस्त मध्ये जगन्नाथ शिंदे यांचा अंत्यविधी यांच्या शेतांमध्ये सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उरकला गेला.
सदरील प्रकारावर सर्व वातावरणात संतापत लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथभाऊ कांबळे  म्हणाले की, महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजावर अन्याय ची मालिका दिवसे दिवस वाढतानाच दिसत आहे. जातीयवादी आणि अमानवीय घटनांमध्ये झालेली वाढ पाहता, पोलीस प्रशासन आणि सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. याची जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी, मागणी केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा