![]() |
तुळजापूर |
*तुळजापूर येथे पैशाच्या कारणावरून राजस्थान येथील फरशी कामगाराचा खून -- दोघांना अटक*
*तुळजापूर शहरात दिनांक 23 मार्च रोजी संध्याकाळी खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पैशाच्या वैयक्तिक देणे घेण्याच्या कारणावरुन हा वाद झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे*
याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे, याबाबत सविस्तर माहिती अशी की राजस्थान येथील फरशी कामगार सुभाष उर्फ बलभीम मेघवाल हा तुळजापूर शहरात फरशीचे काम करत होता .सिद्धार्थ गायकवाड,शुभम जाधव या दोघांनी मयत व्यक्ती बरोबर आर्थिक देवाण-घेवाण केली होती, दि 23 मार्च संध्याकाळी आरोपी अपसिंगा रोड मोतीझरा तांडा येथील शेताजवळ दारू पीत बसले होते .त्या दारूच्या नशा मध्ये आरोपी व मयत मध्ये वादा वादी झाली,या वादावादी मध्ये वरील दोन्ही आरोपींनी सुभाष उर्फ बलभीम मेघवाल याचा त्या ठिकाणी खून करण्यात आला,पोलिसांनी याबाबत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर 302 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे, गुन्हाचा अधिक तपास सुशील कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत, गुन्ह्याबाबत माहिती मिळतात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ दिलीप टिप्परसे, घटनास्थळी दाखल झाले,पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड ,सुशील कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे,पोलीस उपनिरीक्षक राहुल रोटे,पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोपळे,पोलीस कॉन्स्टेबल करण राव,पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार,यांच्यासह डीबी पथक घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.अवघ्या सहा तासांमध्ये तुळजापूर पोलिसांनीआरोपींच्या मुसक्या आवळल्या,याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा