Breaking

बुधवार, १७ मार्च, २०२१

महावितरणने शेतकऱ्यांची वीज तोडू नये अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसणार - अनिल पवार*





*महावितरणने शेतकऱ्यांची वीज तोडू नये अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसणार - अनिल पवार*

वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

        वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची कृषीपंपाची लाईट तोडून शेतकऱ्यांवर अन्याय संपूर्ण जिल्हाभर होत आहे. आपण पाहिलं की गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजविला असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यानंतर अतिृष्टीमुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यातून तो सावरतो न सावरतो तोपर्यंत शेतकऱ्यांची वीज तोडून शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे काम या ठिकाणी सरकार कडून होत आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून त्यांना पाठबळ द्यायचे सोडून त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम या ठिकाणी सुरू असल्याचे दिसत आहे. त्यांना आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगू इच्छितो की, शेतकऱ्यांची वीज तोडून त्यांच्यावर अन्याय केला तर आम्ही तो सहन करणार नाही. आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत आलो आहोत. आणि पुढेही घेतच राहणार आहोत. त्यामुळे आम्ही महावितरण ला विनंती करतो की, शेतकऱ्यांची वीज तोडू नये अन्यथा आम्ही आंदोलनाचे हत्यार उपसून शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा