टेंभुर्णी येथे हनुमान जयंती निमित्त रक्तदान शिबिरात ६५ जणांचे रक्तदान
AJ 24 Taas News Maharashtra
टेंभुर्णी : कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकाने रक्तदान करून संकटात सापडलेल्या गरजू रुग्णांना रक्त पुरवठा कमी पडू नये याकरिता निर्माण झालेली राज्यासमोरील रक्त संकटात सहभाग नोंदविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केल्यानंतर जय बजरंग ग्रुप टेंभुर्णी शहर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते ५ या वेळेस रक्तदान शिबिर आयोजित केले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षित अंतर सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करण्याची खबरदारी घेतली जात होती. या रक्तदान शिबीरात ६५ इतक्या रक्तदात्यांनी सक्रीय सहभाग घेवुन रक्तदान केल्याचे दिसुन आले.
या रक्तदान शिबीरात रक्त संकलनासाठी सांगोला येथील रेवनिल ब्लड बँक या रक्तपेढी चा सहभाग झाला होता. या रक्तदान शिबीरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना जय बजरंग ग्रुप यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच
यावेळी नामदेव धोत्रे, दिलीप पवार, सरस्वती पवार, अमोल धोत्रे, विकास धोत्रे, राम पवार, आकाश धोत्रे,कृष्णा धोत्रे, नितीन चव्हाण, सचिन पवार, कालिदास पवार, प्रतिक माने, महादेव पवार, विशाल पवार, सुरज जाधव. लखन पवार. दादा माने, जॉकी सुर्वे, योगेश पवार, रोहन जाधव, सुरज पवार, लाला पवार, सुनील पवार, प्रदीप धोत्रे, राहुल धोत्रे, विकास माने, सुरज चौगुले, विशाल माने, मनोज धोत्रे, शमिर नाईकनवरे, कैलाश नाचन, बालाजी जगताप, विकास पवार, नाना जगताप, पिंटू जगताप, अण्णा धनवटे, अक्षय शिंदे , टिंकू किर्ते, विशाल धोत्रे, संतोष शिंदे, रोहित खडके, सज्जन पवार, मनोज पवार, अजय शिंदे, प्रेमानंद धोत्रे, अविनाश पवार, विनायक धोत्रे,केतन चौगुले यांच्यासह जय बजरंग ग्रुपचे युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा