*पाण्यासाठी मी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बरोबर राहणार...प्रसंगी संघर्ष करून , न्याय मिळवून देणार--आ बबनदादा ....शिंदे*
कुंभारगाव तालुका इंदापुर या उजनी धरणाच्या बॅक वॉटर परिसरातून पाच टीएमसी पाणी उचलून ते दहा किलोमीटर अंतरावर खडकवासला कॅनॉलमध्ये सोडून इंदापूर तालुक्यातील 22 गावांच्या शेतीची तहान भागवायची व तेथील शेती सुजलाम सुफलाम करायची हा शासनाने घेतलेला निर्णय पूर्णपणे अन्यायकारक व चुकीचा आहे. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी भिके- कंगाल होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पीक रचना ही मुळातच रब्बी जिल्हा म्हणून आहे. उजनी धरण हे आठमाही धरण असून रब्बी हंगामातील चार महिने,व उन्हाळी हंगामातील चार महिने असे एकुण आठ महीने धरणातील पाणी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला पुरविण्यात यावे असा नियम पूर्वीच ठरून गेलेला आहे. उजनीत पाण्याची प्रचंड कमतरता आहे व जर इंदापूरला पाच टीएमसी पाणी नेले तर सोलापूर जिल्ह्याला पाणी शिल्लक राहणार नाही व जिल्ह्याचे वाळवंट होऊन शेतकरी लयाला जाणार आहे ही वस्तुस्थिती नाकारण्यासारखी नाही .यासाठी शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात मी जनतेच्या, शेतकऱ्यांच्या सोबत राहणार आहे, कारण मी स्वतः शेतकरी असून शेती आणि पाणी याचं नातं किती जवळचे आहे हे सर्वांना चांगलं माहीत आहे. त्यामुळे मी सोलापूर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या बरोबरच राहणार आहे व त्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करण्याची माझी तयारी आहे.
आमदार बबनराव शिंदे
माढा विधानसभा मतदारसंघ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा