Breaking

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

*मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत सहानुभूती की चुरस?* *समाधान आवताडेंना भावकीने गाठले खिंडीत...वारु कसा तरणार?* *नानांच्या सहानुभूतीच्या लाटेत महीला उमेदवारीच्या वादळात महाआघाडीच्या उमेदवाराचे "भगिरथ" प्रयत्न...* *✒️निवडणूक विशेष बुलेटिन✒️**अरुण कोरे(पत्रकार, मंगळवेढेकर)यांजकडून...



*मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत सहानुभूती की चुरस?*
   *समाधान आवताडेंना भावकीने गाठले खिंडीत...वारु कसा तरणार?*
   *नानांच्या सहानुभूतीच्या लाटेत महीला उमेदवारीच्या वादळात महाआघाडीच्या उमेदवाराचे "भगिरथ" प्रयत्न...*
     *✒️निवडणूक विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार, मंगळवेढेकर)यांजकडून...*
AJ 24 Taas News Maharashtra



   *कै.भारत नाना भालकेंच्या अकाली निधनाने लागलेल्या मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत निवडणुकीत अंतीम टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके व भाजपचे उमेदवार समाधान आवताडें यांच्या मुख्य लढतीत महीला उमेदवार शैलाताई गोडसे यांनी चांगलेच वादळ निर्माण केले आहे.*
    *भाजपचे उमेदवार समाधान आवताडें यांना पंढरपूरच्या पंतांच्या वाड्याची रसद या निवडणुकीत कितीही पुरवली जात असली तरी पंतांच्या गैरहजेरीत प्रशांत मालकाला "समाधान"चे वारु  तारणे अवघड होऊन बसले आहे.*
     *तर  घरच्या मैदानावर मंगळवेढ्यातच त्यांचें चुलत बंधू सिध्देश्वर आवताडे यांनी खिंडीत गाठून चांगलेच जेरबंद केले आहे.काका मला वाचवाच्या आर्त आरोळीत अकलूजकरांचा आवाजही "बारा"मती खेळीत विरुन गेला आहे.तर कंत्राटी अर्थपूर्ण खुळखुळीत अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले असले तरी त्याचे आवताडे यांना विजयाचे "समाधान"मिळणे दुरापास्तच दिसतें आहे.त्यात भरीसभर मंगळवेढ्याच्या शेठजींनीही "भगिरथ" प्रयत्नाला हातभारच लावला आहे.बबनरावांनी मुलगा सिध्देश्वरासाठी चागलीच कूच केल्याने दामाजीचा आशिर्वाद नाही मिळाला तरी "दामाजी"च्या "अध्यक्ष"पदांवर त्यांनी चांगलाच डोळा रोखला आहे.*
      *तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यासाठी पिताश्री कै.नानानंतर सहानुभूतीची लाट निर्माण झाली असली तरी त्यांच्या लाटेलाही महिला उमेदवार शैलाताईंनीही चांगलेच वादळ निर्माण केले आहे.तर शेतकरी संघटनेचे सचीन शिंदेसाठी "विठ्ठल"ची पुण्याई कितपत पदरी पडणार हे शेट्टींनाच ठाऊक*
   *अंतीम टप्प्यातही चुरस चांगलीच निर्माण झाली आहे.त्यात इतर तेरा उमेदवार कोणाचें तेरा वाजविण्यास हातभार लावणार हेही निवडणूक निर्णया नंतरच कळून येईल.*
   *राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आदी मान्यवरांनी आखाड्यात प्रतिष्ठेसाठी आरोप प्रत्यारोपांची कितीही चिखलफेक केली असली तरी स्थानिक पातळीवर आपापल्या परीने सहानुभूतीचा प्रयत्न प्रत्येक जण कसून करित आहे.*
    *त्यात कल्याणराव काळेंच्या पक्ष बदलीत खासदार नाईक निंबाळकरांवर आमदार संजय मामा शिंदे यांनी कडी करुन भगिरथ प्रयत्नाला हातभारच लावला आहे.*
    *पोट निवडणूकीत कितीही गदारोळ झाला असला तरी प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाच पडले आहे."आमचं ठरलं"चा शेवटचा हात किती सहजपणे फिरणार यावरच बरेच मताधिक्य अवलंबून राहील.*
     *पंढरपूरच्या वाड्यापेक्षा "विठ्ठल"चा प्रश्न, नगरवासीयांचा बदललेला शहरी कल, मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या विकासासाठी कै.भारत नानांनी केलेला आवाज भगिरथ प्रयत्नाला किती हातभार लावणार? , शैला ताईनी व शेतकरी संघटनेने केलेलीं पोखरा-पोखरी यामध्ये आवताडेंचे समाधान होणार की भालकेंच्या भगिरथ प्रयत्नाला हातभार लावणार हे निवडणूक मतपेटीत मतबंदीनंतर दिसून येईलच.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा