*नागरिकांचा जीव वाचवणे हेच शासन-प्रशासनाचे ध्येय – रविंद्र जगताप*
बीड प्रतिनिधि- नवनाथ आडे
गेवराई ( प्रतिनिधी ) :- बीड जिल्हा प्रशासनाने जो काही निर्बंधाबाबतचा निर्णय सोमवारी रात्री जाहीर केला आहे, तो संपुर्ण निर्णय हा राज्य शासनाचा आहे.
जिल्हावासियांना माझी हात जोडून विनंती आहे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे, शासन आणि प्रशासनाला लोकांचे जीव वाचवणे हे महत्वाचे आहे. आमचे ध्येय तेवढेच असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी माध्यमांशी सांगितले.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सदृश्य निर्बंध गरजेचे आहेत.
जिल्ह्यातील व्यापार्यांसह नागरिकांनी ही बाब गंभीरतेने समजून घ्यावी. रात्री जिल्ह्यातील बहुतांशी व्यापार्यांसोबत आपली चर्चा झाली असून त्यांनी प्रशासनाला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे, असं सांगत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यातील जनतेला हात जोडून विनंती केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा