*उजनीच्या धरणे आंदोलनाला आता महिलांचाही पांठीबा*
*शुभदा महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती पाटील यांनी दिले पत्र*
उजनी टें/संतोष पाटील
उजनी धरणाचे पाच टीएमसी. पाणी इंदापूरला नेण्याचा आदेश रद्द करावा या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आता सहा दिवस झाले असून दिवसेंदिवस या आंदोलनाला धार येत आहे.
या आंदोलनाला आता महिलांचाही पाठिंबा मिळत आहे. भिमानगर येथील सामाजिक कार्यकर्त्या व शुभदा महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वातीताई पाटील,भिमानगरच्या माजी उपसरपंच विमलताई गायकवाड यांनी यांनी प्रभाकर भैया देशमुख यांच्या सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी भेट देवून जाहीर पाठिंबा दिला.
सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी इंदापूर तालुक्याने पळवले यामुळे आगोदरच दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात आनखी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे. तरी शासनाने त्वरीत हि योजना रद्द करावी व सोलापूर जिल्ह्याची भाकर हिसकावून घेऊ नये.असे स्वाती पाटील म्हणाल्या
यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख,विठ्ठल मस्के, व आंदोलन करणारे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा