Breaking

शनिवार, २२ मे, २०२१

ब्रेकिंग न्यूज -उजनीचे पाणी पेटले टेंभुर्णी- अकलूज रस्ता टायर पेटवून एक तास पासून केला बंद. ******************************** सोलापूर जिल्ह्यात उद्रेक होण्यास सुरुवात अद्यापही रस्ता बंद*


*ब्रेकिंग न्यूज -उजनीचे पाणी पेटले टेंभुर्णी- अकलूज रस्ता टायर पेटवून एक तास पासून केला बंद*
******************************
*सोलापूर जिल्ह्यात उद्रेक होण्यास सुरुवात अद्यापही रस्ता बंद*
*टेंभुर्णी प्रतिनिधी/AJ 24 Taas News नेटवर्क*

उजनी धरणातील सांडपाण्याच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्याचे पाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 22 एप्रिल रोजी निर्णय घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व संघटना आक्रमक झाल्या.त्यामुळे पुणे येथील सिंचन भवनला भरणे यांनी बैठक बोलावली ती चर्चेतून निष्फळ ठरल्यानंतर गेल्या १२ दिवसापासून उजनी धरण येथे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर भैय्या देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,प्रहार संघटनेचे दत्ताभाऊ व्यवहारे,रयत क्रांतीचे सुहास पाटील व ई.यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.

दोन दिवसापूर्वीच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर हा निर्णय रद्द करत आहोत असे सांगीतले परंतु आंदोलनकर्त्यांना लेखी आदेश न मिळाल्यामुळे आंदोलन सुरुच आहे.राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांना लेखी न देता उलट त्रिसदस्यीय समिती नेमून मीठ चोळल्यामुळे  या घटनेचा निषेध व्यक्त करताना शेतकऱ्यांनी अकलुज-टेंभुर्णी रस्त्यावर वाफेगावचे शेतकऱ्यांनी टायर पेटवून आंदोलन अधिक तीव्र होणार हे दाखवून दिले. असून अद्यापही रस्ता बंद असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते अकलूज टीमने रस्त्याला टायर पेटवल्या मुळे दोन्ही साइटची वाहतूक खोळंबली असल्याचे समजते. अद्याप या ठिकाणी प्रशासन पोहोचले नसल्याने वाहतुकीचा रस्ता खुला झाला नसल्याचे समजते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा