औटेवाडी येथीलकै.शालन तुपे यांचे निधन
श्रीगोंदा:-नितीन रोही
शहरामधील औटेवाडी येथील कै. शालन बाजीराव तुपे,वय ७५वर्ष यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री निधन झाले.त्यांना पक्षाघात आणि किडनी विकारावर ७ महिने उपचार चालू होते.त्या पत्रकार अंकुश तुपे यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर औटीवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या मागे ३मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पतीच्या निधनानंतर कै.शालन यांनी मुलांचा सांभाळ करत खुप कष्ट करून कुटुंब चालविले त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील तसेच परिसरातील मान्यवरांनी आणि पत्रकार बांधवांनी हळहळ व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली आहे.
दशक्रिया विधी बुधवार दिनांक १९मे रोजी सिद्धटेक येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा