Breaking

मंगळवार, २५ मे, २०२१

हिंमत असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा- विजय शेंडे श्र



*हिंमत असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा- विजय शेंडे 

श्रीगोंदा:-नितीन रोही,
           

  गेली पंधरा वीस दिवस कुकडीच्या पाण्याबाबत श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कुकडीच्या पाण्यासंदर्भात जुन्नर तालुक्यातील प्रशांत औटी यांनी याचिका दाखल केली आणि कुकडीचे पाणी लांबले.
          त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील अनेक नेत्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली. त्यामध्ये आमचे नेते बाळासाहेब नाहाटा व राजेंद्र आबा मस्के यांचा पण सामावेश होता त्यानंतरचे रामायण काय घडले हे आपणा सर्वांना माहीत आहे.
       कुकडीच्या पाण्याचा कायमच खेळखंडोबा होतो म्हणून बाळासाहेब नाहाटा यांनी दैनिक लोकमतला शेतकऱ्यांची बाजु मांडण्याचा प्रयत्न केला.
      त्यानंतर त्यांना आरोप सिद्ध करा नाहीतर माफी मागा अशी नेत्यांची बातमी आली त्याला पण नाहाटा साहेबांनी चोख उत्तर दिले.
        पण हे उत्तर त्यांना चांगलेच झोंभलेले दिसते. घनश्याम शेलार समर्थक अजिम जकाते यांनी कुकडी चा विषय सोडून नाहाटा साहेबांवर वैयक्तिक आरोप केले आहेत. की जे आरोप बिनबुडाचे व खोटे आहेत असे आरोप आम्ही गेली दहा-बारा वर्ष झाले बघतोय.
महाशय आपल्या माहितीसाठी सांगतो की नाहाटा साहेबांनी पाचपुते यांच्या विरोधात भूमिका घेतली होती आज पण कायम आहे. आम्ही त्यांची वकिली करीत नाही.
फक्त कुकडीच्या पाण्याबाबत साहेबांनी त्यांच्याविषयी भूमिका मांडली. पाचपुतेंवर जे काय आरोप साहेबांनी केले त्या भूमिकेविषयी आज पण ते ठाम आहेत. त्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची गरज नाही.

सोशल मीडियावर आमच्या नेत्या वरचे आरोप सहन करणार नाही. जशास  तसे उत्तर देऊ असे पण म्हणतात मग आम्ही पण काय बांगड्या भरल्यात काय..?
आमच्या पण नेत्यावरचे खोटे आरोप सहन करायला गेले
पंचवीस वर्षाच्या राजकारणात असले आरोप साहेबांनी खूप सहन केलेत.
       आपण साहेबांनी मुख्यमंत्री व सनदी अधिकाऱ्यांचे खोटे शिक्के बनवल्याचे आपण सांगता. तसेच त्यांनी जेल वारे केल्याचे सांगतात आपल्या माहितीसाठी सांगतो 2010 सली साहेबांवर गुन्हा दाखल झाला. महाशय,  आता 2021 साल आहे
 अकरा वर्षात का नाही या विषयाची कायदेशीर कारवाई झाली साहेबांनी जगदंबा सहकारी साखर कारखाना दोन वेळा लिलावात घेतला त्यांनी तो कारखाना घेऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यांनी भाऊसाहेब आंधळकर या भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून साहेबांवर खोटे गुन्हे दाखल केले आणि जगदंबा साखर कारखाना व अडीचशे एकर जमीन फक्त 28 कोटी ला गिळंकृत केला हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे हे पाप सुद्धा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे आहे या घटनेने  बाळासाहेब  हतबल झाले नाही तर त्यांनी खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला.एवढे मोठे आरोप करून गुन्हा दाखल केला. सर्व आरोप हे सेशन कोर्टा शिवाय जामीन न होणारे होते परंतु ज्युडिशियल स्थानिक कोर्टात जामीन मंजूर झाला. परंतु जुदिशियल स्थानिक कोर्टात जामीन मंजूर झाला आज पर्यंत या विषयाची कुठलीही कायदेशीर कार्यवाही झाली नाही. फक्त जगदंबा घेऊ नये म्हणून खोटा गुन्हा दाखल केला. त्यातील भाऊसाहेब आंधळकर या अधिकाऱ्याला अशा खोटे नाट्य केसेस मुळे पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले तपासी अधिकारी नाळे यांनी आत्महत्या केली. ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचे असे वाटोळे झाले. तसेच आपण आदिवासी महिले बाबत साहेबांवर चारित्र्याचे आरोप केले आहेत सदर गुन्ह्याचा तपास एलसीबी कडे वर्ग करण्यात आला होता त्याचा तपास पूर्ण होऊन नाहाटा साहेबांवर दाखल केलेला गुन्हा खोटा आहे असा रिपोर्ट दिला आणि हा गुन्हा B फायनल झाला आपण जरा नीट माहिती घेत जा कोणाच्या तरी सांगण्यावरून असे खोटे व बेलगाम आरोप करू नका तसेच आपण साहेबांवर तोंड लपवत असल्याचा एक आरोप केला. माहितीसाठी  साहेब 24 तास श्रीगोंदा आणि कार्यक्षेत्रात आहेत त्यांचा फोन 9423465555 हा 24 तास चालू आहे.
     त्यांच्या वैयक्तिक व्यवहाराची उठाठेव तुम्ही करू नका तो अधिकार तुम्हाला नाही कुणाला साहेबांचे तोंड पाहण्याची इच्छा असेल मला ठिकाण सांगा मी त्यांना घेऊन येतो, फक्त विषया पुरते बोला चुकीचे घाणेरडे आरोप करू नका आरोप करताना पातळी सोडू नका
  मी आपल्याला या निमित्ताने आव्हान करतो की आपण केलेल्या आरोपा पैकी एक जरी आरोप सिद्ध झाला किंवा आपल्याला सिद्ध करता आला  तर नाहाटा साहेबांना राजकीय संन्यास घ्यायला लावू किंवा आपण सांगाल ती शिक्षा घेऊ!2009 नंतर साहेबांवर 13 (राजकीय हेतू गुन्हे दाखल झाले)
 त्यापैकी एक पण आरोप सिद्ध झाला नाही चार ॲट्रॉसिटी चे गुन्हे दाखल झाले.
ते चारी पण गुन्हे B फायनल झाले आदिवासी महिलेचा पण गुन्हा B फायनल झाला
आपण केलेले आरोपा पैकी एकाही गुन्ह्यात साहेब दोषी नाहीत, 
कशाला बिनबुडाचा आरोप करता.
      
 *नथीतून तीर मारण्याचे उद्योग बंद करा- सरपंच विजय शेंडे*
     तसेच आजीम जकाते यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारू नका! 
   पाण्याची लढाई खाजगी जीवनात नेण्याचा प्रयत्न करू नका.
आम्हाला पण पातळी सोडता येते महामंडळा पासून ते अत्तर शेख 
यांच्या निकाला पर्यंतच्या सर्व गोष्टि आम्हाला पण बोलता येतात
ती पातळी सोडायला लावू नका!आपण 35 वर्षाचा राजकीय हिशोब मांडला .
    त्याच प्रमाणे आपला 35 वर्षाचा राजकीय हिशोब जनतेला माहित आहे. म्हणून 35 वर्षात आपण कधीच ग्रामपंचायत सदस्य होऊ शकला नाहीत
एकदाच कारखान्याचे चिट्ठी खाऊन एक मताने संचालक झालात. कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय कुंडलिक तात्या जगताप यांनी हयात असताना कधीच संचालक होऊ दिले नाहीत. आदरणीय बापूनी पण राजकारणामध्ये विशेषता सहकारात कधीच थारा दिला नाही कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराची तक्रार कोणी केली व ती तक्रार मागे कशी घेतली हे सर्वांना माहीत आहे अयोध्या नागरी सहकारी पतसंस्था ही आपण काढलेली पहिली सहकारी संस्था ती बंद कशामुळे झाली?
        आपण सुरु केलेले सहकार हॉस्पिटल त्याचे काय झाले किती पेशंटला सुविधा मिळाल्या ते हॉस्पिटल सुद्धा बंद झाले.
नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण पॅनल सहित नगराध्यक्ष नगराध्यक्ष चा उमेदवार उभा केले
त्या सर्वांनी कसे काय विड्रॉल केले हे सर्वांना माहीत आहे आपली राजकीय दुकानदारी सर्वांना माहित आहे म्हणूनच 35 वर्षाच्या राजकीय कार्य कीर्ती एकही निवडणूक आपल्याला जिंकता आली नाही.
त्यामुळे 35 वर्षाचा राजकीय हिशोब कमीत कमी आम्हाला तरी सांगू नका
        मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली   
राहुल दादा जगताप यांनी उमेदवारी नाकारली म्हणून आपला नंबर लागला पवार साहेबांच्या सहानभूती मुळे आपल्याला मते पडली आता निवडणूक करून बघा काळच आपल्याला उत्तर देईल या उलट
      नाहाटा साहेबांच्या राजकीय कारकीर्तीत 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य 5 वर्ष उपसरपंच ,15 वर्ष सोसायटीचे संचालक,5 वर्ष पंचायत समिती सदस्य ,4 वर्ष खरेदी-विक्री संघाचा संचालक, 15वर्ष बाजार समितीच्या संचालक त्यापैकी 12 वर्ष बाजार समितीचे सभापती व 4वर्ष राज्य बाजार समितीचे संचालक म्हणून तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे 2वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले साहेबांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात अनेक नेत्रदीपक काम केले
 1) मातंग समाजाचे आधारवड अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत केली
2) कोथरूडच्या खंडोबा मंदिरावर तीस वर्षात लाईट गेली नव्हती साहेबांनी आठच दिवसात सव्वापाच लाख रुपये खर्चून लाईट नेली
3) गाव ते वाडी जोडणारे रस्ते स्वखर्चाने केले
4) शेडगाव सारख्या माझ्या गावात विकास कामासाठी साहेबांनी तब्बल चाळीस लाख रुपये खर्च केले
5) श्रीगोंदा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध संस्थांना 7 लाख रुपये देणगी दिली.
  
      तसेच बाजार समितीचे सभापती म्हणून काम करताना तब्बल 12वर्ष एक रुपयाही मानधन घेतले नाही साहेब पंचायतसमितीचे महाराष्ट्रातले एकमेव सदस्य असे होते की ज्यांनी पंचायत समितीचा एक रुपयाही मानधन घेतले नाही याही चांगल्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे तशी आपली काय नोंद घ्यावी तूर्तास एवढेच.
ही सर्व माहिती शेंडे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा