*चव्हाणवाडी ग्रामपंचायत ने दिला धरणे आंदोलनाला पाठिंबा*
टेंभुर्णी ,प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी पालकमंत्री यांनी इंदापूर तालुक्याला नेण्याचा आदेश काढला याच्या विरोधात सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज दहा ते पंधरा दिवस झाले जनहित शेतकरी संघटनेचे नेते *प्रभाकर भैया देशमुख व संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप* प्रहार संघटनेचे दत्तात्रय भाऊ व्यवहारे यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे या आंदोलनासाठी सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच गावातून पाठिंबा मिळत आहे
तसेच आज चव्हाणवाडी टें या ग्रामपंचायतीने या धरणे आंदोलनाला साठी आपल्या पाठिंब्याचे पत्र प्रभाकर भैय्या देशमुख यांना दिले यावेळी पाठिंब्याचे पत्र देताना *चव्हाणवाडी गावचे सरपंच सुनील मिस्कीन, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी मनोज नांगरे पाटील, तसेच सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी श्री सुभाष बापू इंदलकर, संभाजी ब्रिगेड गटप्रमुख भारत जगताप, व अण्णासाहेब इंदलकर पाटील, संभाजी ब्रिगेड पंढरपूर तालुका अध्यक्ष सोमनाथ गायकवाड इत्यादी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा