राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी प्रामाणिक,सामाजीक बांधीलकीतून काम करणाऱ्या कोविड सेंटर कडे फिरवली पाठ....
श्रीगोंदा-नितीन रोही,
सविस्तर असे की एकीकडे राजकारण विरहित सर्वत्र कोविड सेंटर मधून रुग्ण सेवा सुरू असताना नगर जिल्ह्यातील रहिवासी आणि राज्याचे ऊर्जा,नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे यांनी श्रीगोंदा दौऱ्यात पक्षीय अंतर पाळून केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत कोविड सेंटरला भेट दिल्याची टीका राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहटा यांनी केली ते म्हणाले या दौऱ्याची आखणी कोणी केली त्यांच्या डोक्यात राजकारण यावे याचे दुर्दैव वाटते
मुळात राज्य सरकारच्या बेफिकीरीचा सर्वाधिक फटका श्रीगोंदा तालुक्याला बसला ऑक्सिजन अभावी मृत्यू संख्या वाढली ऑक्सिजन बेड मिळत नसल्याचे पाहून आपण लोणी व्यंकनाथ सारख्या ग्रामीण भागात ऑक्सिजन बेड असलेले कोविड सेंटर उभारले या सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर तर मिळवलेच पण तालुक्यातील ठिकठिकाणी कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर पोहोच केले असे सांगून नाहटा म्हणाले रुग्णांची सेवा करताना मला कोरोनाची लागण झाली अशा सेंटरला भेट देऊन अडचणी समजावून घेण्या ऐवजी मंत्री महोदय कोळगाव,पिंपळगाव पिसा येथे आले पण घारगाव ला जाण्याऐवजी बेलवंडी ला आत गेले जिथे सशुल्क सेवा आहे! पुढे मात्र आपण १रुपया न घेता चालवत असलेल्या लोणी व्यंकनाथ सेंटरकडे मात्र पाठ फिरवली यातून त्यांनी पक्षीय अंतर पाळले.आणि तसेच आमचे कोळगाव,बेलवंडी,पिंपळगाव पिसा येथे उर्जामंत्री तनपुरे यांनी भेट देण्यास विरोध नाही पण त्यांनी इतर सेंटरला भेट दिली असती तर आम्हाला काम करण्याची अधिक ऊर्जा मिळाली असती म्हणून हा पत्र प्रपंच आणि श्रीगोंदयात आढावा बैठकीत मात्र सर्व पक्षीय एकत्र येऊन कोविड सेंटर चालवत असल्याचे कौतुक केले हे अनाकलनीय आहे.
कोविड लस बाबतही गोंधळ चालू आहे,कोरोना टेस्ट किट नसल्याने १५ दिवसांपूर्वी रुग्णांचे हाल झाले त्यावेळी दौरा आयोजक काय करत होते असाही सवाल आहे
चौकट,
पाट पाण्याबाबतही श्रीगोंदा करांवर अन्याय झाला त्याबाबतही नाहटा यांनी टीका केली राज्यात त्यांचे सरकार असताना वजनदार नेते असताना दरवर्षी शेतीला पाणी नाही तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे असे
*बाळासाहेब नाहटा*
संचालक, राज्य बाजार समिती
मुंबई.यांनी म्हणटले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा