Breaking

सोमवार, २८ जून, २०२१

शेतकरी पिक विमा,पिक कर्ज माफी त्वरित द्या-मोहनराव सिरसाट



शेतकरी पिक विमा,पिक कर्ज माफी त्वरित द्या-मोहनराव सिरसाट
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

शेतकऱ्यांना पीक विमा,पिक कर्ज माफी त्वरित द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी किसान भारती नांदेड जिल्हा अध्यक्ष मोहनराव सिरसाट यांनी राज्याचे जलसंपदा  मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात व तालुक्यात शेतकऱ्यांना विमा कंपणींनी विमा दिला नाही व पीक कर्जाचा सर्वांना लाभ मिळाला नाही.सततच्या नापिकी मुळे कधी अधिकच्या पावसामुळे तर कधी पाऊस न पडल्यामुळे शेतकरी राजा गेल्या दोन वर्षांपासून तर या कोरोना सारख्या महामारीच्या संकटात सापडला आहे.सरकारने जाहीर केलेल्या पीक कर्ज माफीची पूर्तता करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात वाढीच्या दृष्टीने व कार्यकर्ता व सामान्य माणसात कामास अवसर व आपुलकी मिळवण्यास केलेल्या वरील कामाचा लाभ होईल.
तरी आपण लक्षपूर्वक कामे मार्गी लावल्यास याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व कार्यकर्त्यांना फायदा होईल वाव मिळेल अशी विनंती निवेदनाद्वारे राष्ट्रवादी किसान भारतीचे नांदेड जिल्हाध्यक्ष मोहनराव सिरसाट यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा