*चेतना सिन्हा यांची भुरकवडी आयसोलोशन सेंटरला भेट*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
भुरकवडी ( ता. खटाव ) येथील ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू करण्यात आलेल्या आयसोलोशन सेंटरला माणदेशी फांऊडेशनच्या संस्थापिक अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदिपदादा मांडवे यांनी नुकतीच भेट दिली.
यावेळी माहिती घेताना श्रीमती सिन्हा म्हणाल्या, कोरोना रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भुरकवडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आयसोलोशन सेंटरची केलेली उभारणी सेंटरचे कार्य समाधानकारक व आदर्शवत आहे. माणदेशी फाऊंडेशनच्या वतीने आम्ही आपली जबाबदारी म्हणून जेवणाची सोय केली असून अजून काही मदत लागल्यास आम्ही ती माणदेशी फाऊंडेशच्या माध्यमातून करू असेही म्हटले आहे.
ग्रामीण भागातील कोरोनाला पूर्णपणे अटकाव करण्यासाठी प्रत्येक केंद्रातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे अत्यावश्यक आहे. केंद्रातील व्यक्तीना व रुग्णांना ग्रामपंचायत, ग्राम कृती समिती व आरोग्य विभाग यांच्यामार्फत सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. केंद्रातील सर्व रूग्णांची आरोग्य विषयक विचारपूस केली. तसेच स्थानिक ग्राम कृती समिती, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य यंत्रणा यांच्याकडून दररोजच्या नियमित कामकाजाची माहिती घेतली. यावेळी संदीप मांडवे म्हणाले, कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भुरकवडी ग्रामपंचायतीने आयसोलोशन केंद्राची उभारणी चांगल्या प्रकारे केली असून लोकसहभाग असेल तर कोणतेही काम उत्कृष्टच होत असते.
यावेळी माणदेशी महिला बँकेच्या वडूज शाखाप्रमुख स्मिता टकले, सरपंच सौ.ललिता कदम, माजी सरपंच शिवाजीराव कदम, एस.के. कदम सर, पत्रकार शरदराव कदम, सोसायटीचे माजी अध्यक्ष मधुकर कदम, छगनराव कदम, ग्रामसेविका धनश्री गमरे, मुख्याधिपिका सौ.कुंदप मॅडम, सुतार मॅडम, आरोग्य सेविका स्मिता जंगम, आरोग्य सेवक निलेश राऊत, आशा सेविका रेश्मा फडतरे, सिमा जाधव, अंगणवाडी सेविका शुभांगी कदम, मनिषा चव्हाण, मदतनीस सुमन कदम, रंजना कुंभार, संजय कदम आदिची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा