*कोरोना मध्ये मृत्यू पावलेल्या मातंग समाजातील कुटुंबियांना पतपुरवठा करावा या मागणीसाठी माजी सभापती शिवाजी गायकवाड यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन*
मातंग समाजातील कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या मातंग समाजातील कुटुंबियांना कर्ज स्वरूपात पतपुरवठा मिळावा अशी मागणी मातंग समाजाचे नेते तथा तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कोरोनाच्या महामारी मध्ये मातंग समाजातील कुटुंब कर्ते मृत्यू पावल्या मुळे त्यांचे वारस उघड्यावर पडले असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी ४ लाखापर्यंत कर्ज पुरवठ्याची अर्थसहाय्य करण्यात यावे, महात्मा फुले, संत रोहिदास, महामंडळ व अन्य महामंडळास असे कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य देण्यात येत आहे, तरी मातंग समाजातील मृत्यू पावलेल्या वारसांना कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य देण्यात यावे,अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे, या निवेदनावर माजी सभापती शिवाजी गायकवाड यांची स्वाक्षरी आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा