*पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या खावटी अनुदान योजना लाभ*.
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे सगळ्यात जास्त प्रभावित आदिवासी व इतर अनुसूचित जमातीस शासनाद्वारे खावटी अनुदान पोहच करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आदिवासी विकास मंत्री पाडवीसाहेब यांच्या विशेष सहकार्याने खावटी योजना कार्यान्वित करून अमंलबजावणी करण्यात आली आहे. खटाव ( ता.खटाव ) येथे हि या योजनेतील पात्र लाभार्थींना हा लाभ देण्यात आला आहे. यावेळी खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमरसिंह देशमुख, पारधी सामाजाचे राज्य खजिनदार काश्मिर शिंदे तसेच शासनाने प्रतिनिधी म्हणून मांडवे मॅडम, जाधव सर, घाडगे सर, पाटील सर आदिंसह लाभार्थ्यांची उपस्थिती होती.
कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कोरोना कालावधीसाठी राज्यशासन व आदिवासी विकास विभागातर्फे बंद झालेली खावटी अनुदान योजना पुन्हा पुनर्जिवीत करण्यात आली आहे. सन २०२०/२१ मध्ये खावटी अनुदान पात्र असलेल्या लाभार्थ्यांना खटाव तालुक्यातील पारधी समाज , ठाकर समाज व इतर अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना या अनुदानाचा लाभ होणार आहे. पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळण्याच्या दृष्टीने वर्षभर सामाजिक कार्यकर्ते व संघटना कार्यरत होत्या.
या योजनेत पात्र असणा-या लाभार्थ्यांना एकुण ४ हजार रूपयांचा लाभ मिळणार आहे. या मध्ये त्यांना २ हजार रूपये अनुदान डीबीटी द्वारे थेट खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसेच २ हजार रुपयांचे जीवनावश्यक साहित्य यामध्ये किराणा सामानाच्या किटचा समावेश करण्यात आला आहे. सदर योजना पूर्वीच्या काळात फक्त आदिवासी जमातीसाठी कार्यान्वित होती प्रथमच या योजनेत कातकरी, माडीया, कोलाम आदि मागास प्रवर्गाचा समावेश करण्यात आला असल्याचे संबंधितांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा