मानवाधिकारकडून पाचशे कुटुंबांना पाचशे किटचे वाटप
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
पाटण तालुक्यातील आंबेघर, कुसरूड, माणगाव व सांगली जिल्हातील शांतीनिकेतन विभागात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक कुंटुबे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांचे संसार उघडयावर पडले. अशा लोकांना अन्नधान्य व निवारा गरजेचा आला असताना महाराष्ट्र राज्य मानवाधिकार राजदूत संघटना, मातोश्री द्रोपदा बबन पठारे चारीटेबल ट्रस्ट, माहिती अधिकार पोलीस मित्र व संजरी फाऊंडेशन यांच्यावतीने ५०० कुटुंबांना ५०० किटचे वाटप करण्यात आले. मानवाधिकार संघटनेच्या वतीने नुकसानग्रस्त कुंटुबीयांच्या भेटी घेऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. या किटमध्ये महिलांसाठी कपडे, ब्लॅकेट, बिस्किटपुडे, डाळी, गव्हाचा आटा, गरा, साखर, साबण असे जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश सुकुंडे, राष्ट्रीय अध्यक्ष कैलासदादा पठारे, समन्वयक इसा शेख, सचिव नानासाहेब मेडे, जाकीर पठाण, सातारा जिल्हाध्यक्षा शारदा भस्मे, निर्मला काटकर, प्रतिभा काटकर, अर्चना यादव, सविता सांळुखे, हजीरा शिक्कलगार, उमाजी कुकले, सुहास कुलकर्णी, सरफराज पटेल, किशोर पवार, मंजूर मुजावर, विनोद सावंत, बाळासाहेब पवार आदिसह सातारा जिल्हयातील मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी यांनी किटचे वाटप केले. मानवाधिकार व इतर संघटनेने मिळून विकासात्मक पाऊल टाकत असताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील कुटुंबांकडून मानवाधिकार व इतर संघनाचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा