केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये-तानाजी गाडे पाटील
भिमानगर प्रतिनिधी/प्रदीपराव पाटील
मागील महिनाभरापासून केळी मालाला चांगला बाजारभाव मिळत होता.परंतु गेली आठ दिवस झाले अफगाणिस्तान या देशाने केळीची आयात बंद केल्यामुळे केळीची मागणी कमी झाली अशा स्वरूपाची अफवा केळी व्यापाऱ्यांनी उठवली असून वास्तविक पाहता अशा प्रकारची कोणतीही परिस्थिती नसून शेतकऱ्यांनी आपल्या केळीला योग्य भाव देणाऱ्या व्यापाऱ्याला केळी द्यावी असे आवाहन नेहरू युवा समितीचे माढा तालुका अध्यक्ष तानाजी गाडेपाटील यांनी केले आहे.
सध्य परिस्थितीमध्ये पेट्रोल,डिझेल व गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत खताच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.मजुरीचा दर वाढला आहे. शेतीच्या मशागतीच्या दर वाढला आहे शेतकरी सर्व बाजूंनी भरडला जाऊ लागला आहे. एकमेव केळी या पिकाला बऱ्यापैकी भाव मिळत होता तोही काही व्यापाऱ्यांनी संगणमत करून अफवा पसरवण्याचे काम चालू केले आहे व केळी चादर पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे तानाजी गाडे पाटील यांनी सांगितले.
टोमॅटोचे दर प्रति किलो 5 रुपये झाले असून भेंडी,गवार,कोबी कोथिंबीर,फ्लावर यांच्याही दराची अत्यंत परिस्थिती वाईट झालेली आहे. उत्पादनाचा खर्च मिळेना अशातच वीज मंडळाने भरावीत म्हणून वीज कनेक्शन कट केली असून शेतकऱ्यांची चोहबाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.तरी शेतकऱ्यांनी जागृत होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन तानाजी गाडे पाटील यांनी केले आहे.
चौकट
अफगाणिस्तान या देशाला दिवसाला पंधरा कंटेनर केळी लागत असून दुबई इराण या देशाला सर्वात जास्त मागणी भारतातील केळीला असून सद्यपरिस्थितीत केळीचे कमी असून अजूनही दर वाढणार होता.त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तानाजी गाडे पाटील वडोली ता माढा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा