श्रीगोंद्यात शिवसेनेचे गट-तट...वातावरण पेटले....
निष्ठावंतांची कुकड़ी गेष्ट हाऊस येथे बैठक....
श्रीगोंदा-नितीन रोही,
तालुक्यातील जुन्या शिवसैनिकांची समविचारी बैठक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम भाऊ वाकळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असे युवसेनेचे नाथा पवार यांनी सांगितले या बैठकीसाठी श्रीगोंदा तालुका शिवसेना संघटक नंदकुमार ताडे,उपतालुका प्रमुख-मा.सरपंच संतोष शिंदे,युवा सेना तालुका संघटक नाथा पवार,युवा सेना तालुका उपप्रमुख शिवाजी दांगडे, चोराचीवाडी चे उपसरपंच दादा चव्हाण,अजित दिंडे,शाखाप्रमुख ऋषिकेश खरात, मयूर चव्हाण, अनिल हिरडे,अनिल सुपेकर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दादासाहेब ढगे, तुषार दांगडे, प्रमोद दांगडे,यांच्या सह शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते या बैठकीत सर्व शिवसैनिकांच्या विचाराची बैठक म्हणजे तालुक्यामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख कुठल्याही पद्धतीने जुन्या शिवसैनिकां विश्वासात घेत नाहीत मनमानी कारभार करतात तालुक्यामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख यांची निवड झाल्यापासून पक्षाचे नियम असताना एकही मीटिंग आयोजित केली नाही.
त्यामुळे तालुकाप्रमुख यांना काही शिवसैनिकांनी मीटिंग साठी विचारणा केली असता,तालुकाप्रमुख यांनी शिवसैनिकांना सांगितले की माझं कुणी काही करू शकत नाही मी काही करेल तेच पूर्व दिशा असेल त्याच प्रमाणे मी कुणाला निवडायची ते मी ठरविले त्याप्रमाणे त्यांनी खरे करून दाखवले आत्ताच दोन महिन्यापूर्वी युवा सेनेमध्ये नवीन कार्यकर्ते आलेले त्यांना लगेच युवा सेनेचे तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली या निवडीसाठी कुठलीही पद्धतीची शिवसैनिकांची व युवा सैनिकांची मीटिंग लावण्यात आली नाही.
असा कारभार जर तालुकाप्रमुख करीत असतील तर पक्ष वाढवायचा का नाही हे जुन्या शिवसैनिकांना प्रश्न पडला आहे यासाठी शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर,जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम वाकळे यांनी श्रीगोंद्यात लक्ष घालण्याची अत्यंत गरज आहे कारण पुढे सहा-सात महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकालागत आहेत त्यासाठी सर्वांची वरील वरिष्ठांनी विचारात घेऊन योग्य त्या पद्धतीने निवड केली पाहिजे व निवड करताना तालुक्यामध्ये सर्व शिवसैनिक युवासैनिक गोळा केले पाहिजे व त्यांच्या समोर श्रीगोंदा मध्येच हे दोन्ही पद निवडली झाली पाहिजे यासाठी ही सम विचाराची बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये वरील नेत्यांनी यामध्ये लक्ष घालून ही कार्यकारनी बरखास्त करून पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीने ह्या निवडी करण्यात याव्यात ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे व वरील पदाधिकारी निश्चित पणाने जिल्हा परिषद पंचायत समितीची यादी हे निर्णय घेतील अशी सर्वांना अपेक्षा आहे यापुढेही या कार्यक्रमामध्ये गाव तिथे शाखा झालीच पाहिजे असेही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले या कार्यक्रमामध्ये समीर काजी, अनिल हिरडे, शिवाजी धांगड, नाथाभाऊ पवार,दादासाहेब ढगे, मयूर चव्हाण,ऋषिकेश खरात, नंदकुमार ताडे,संतोष शिंदे,यांनी मनोगत व्यक्त केले.आणि आभार ऋषिकेश खरात यांनी मानले.
फोटो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा