*मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद जिल्हा व तालुका पदाधिकारी निवडी संपन्न*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्ली यांचे कडून सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा व तालुका स्तरावरील निवडी नुकत्याच करण्यात आल्या.
यामध्ये सोलापूर जिल्हा सचिव संदीपान गुटाळ, करमाळा तालुका अध्यक्ष रिकेश नलवडे,जिल्हा मंत्री विष्णू गायकवाड,सोलापूर जिल्हा मिडिया प्रमुख पांडुरंग भगत,जिल्हा संयोजक विठ्ठल मुनगापाटील,जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल देशमुख,जिल्हा कायदेशीर सल्लागार सागर पवार,वरिष्ठ मंत्री राजेंद्र पवार, माढा तालुका अध्यक्ष भिमराव भरगंडे,जिल्हा उपाध्यक्ष संजय गवळी यांची निवड मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष महंमदयासिन शेख,सोलापूर जिल्हा अध्यक्ष अनिल धायगोडे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी बोलताना राष्ट्रीय उपाध्यक्ष महंमदयासिन शेख म्हणाले," समाजातील विविध स्थरातील गरीब लोकांची निश्वार्थपणे मदत करणे, बालविवाह, बालमजुरी, समाजात घडणाऱ्या अनिष्ट प्रथा व भ्रष्टाचार यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे आदी कामांची जबाबदारी नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची आहे .यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले, कोणतेही काम पदाधिकाऱ्यांनी प्रमाणिकपणे करावे. अध्यक्षीय भाषणात सोलापूर जिल्हा अध्यक्ष अनिल धायगोडे म्हणाले," मानवाधिकार न्याय सुरक्षेच्या नवीन निवडलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्य क्षेत्रात समाजातील विविध घटकांतील लोकांना न्याय देण्याचे काम करत रहावे. यावेळी मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेच्या नवीन निवडल़ेले सर्व पदाधिकारी यांनी आपली मनोगत व्यक्त केली. गहिनीनाथ गुंजाळ, करमाळा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष अतुल वारे पाटील, सचिन टेकाळे, पंढरीनाथ गुरव, पत्रकार आबासाहेब साळुंखे, पत्रकार सदाशिव पवार, प्रशांत लामतुरे सोलापूर, जयदीप पवार अकोले, आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा