*“राणेंना केलेली अटक योग्यच पण…”; पाहा न्यायालयानं दिलेल्या निकालात काय म्हटलंय!*
उमेश विभुते
विशेष जिल्हा प्रतिनिधी
कोल्हापूर
7058567272
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर राणेंनी महाड येथील न्यायालयातील प्रथम दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला. जामीन मंजूरकरण्यासंदर्भातील सुनावणीदरम्यान दंडाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याविरोधात वक्तव्यासाठी करण्यात आलेली अटक योग्यच असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
*या प्रकरणाबाबत न्यायालयाने निकालात महत्वाची माहिती दिली आहे. राणेंची सात दिवसाची कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. यावर पोलीस कोठडी देऊन चौकशी करण्याची गरज नाही, असं महाड येथील दंडाधिकारी यांनी सांगितलं आहे.*
*24 ऑगस्टच्या रात्री न्यायालयाने दिलेल्या निकालातील निर्णयाची प्रत आज म्हणजेच 25 तारखेला सगळ्यांसमोर आली आहे. त्यामध्ये अटक करण्यात आल्याचं कारण आणि इतर कारणं ही अटकेच्या कारवाईसाठी योग्य असं मला वाटतं, असं दंडाधिकारी एस.एस. पाटिल यांनी न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे.*
दरम्यान, भविष्यात अशा प्रकाराची वक्तव्ये करणार नसल्याची हमी देत 15 हजारांच्या जातमुचलक्यावर नारायण राणेंना न्यायालयाने जामीन मंजूर केला. याबाबत न्यायालयाने राणेंकडून लेखी हमी लिहून घेतल्याची माहिती समोर येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा