*कुर्डुवाडीत टेंभुर्णी रोडवरील "नेहरू नगर"मातंग वस्तीतील कामे कागदोपत्रीच?
*नागरिकांना प्यावे लागते सौचालयाचे पाणी? गंभीर परिस्थिती...*
*मातंग एकता समाज सोमवारी धडकणार नगरपरिषदेवर...*
कुर्डूवाडी प्रतिनिधी/ मातंग एकता आंदोलन समाजिक संघटना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा नेहरू नगर कुर्डुवाडी,
आजचे कुर्डूवाडी शहरातील नेहरू नगर परिसरातील अत्यंत वाईट परिस्थिती नेहरूनगर मध्ये पिण्याचे पाण्याचे सार्वजनिक नळ कनेक्शन नागरिकांना नसल्यामुळे शौचालय साठी जे पाणी येतं ते पाणी नागरिक पिण्यासाठी वापरत आहेत अत्यंत अशी वाईट परिस्थिती आज कुर्डूवाडी नगर परिषदेच्या माध्यमातून आज मातंग एकता आंदोलन सामाजिक संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दाखवण्यात आले आहे परिसरामध्ये नाले मोठ्या प्रमाणात तुंबलेले आहेत महिला शौचालय याची मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झालेली आहे महिला शौचालय ची सेफ्टी टँक धोकादायक असून अपघात झाल्यास याला जबाबदार कोण .... ???
तसेच परिसरात घान वास मोठ्या प्रमाणे मध्ये पसरलेला आहे अशा या घाणीचे साम्राज्य मध्ये नेहरूनगर मधील नागरिक राहत आहेत त्यांच्या आरोग्याचा / जिवीताचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीत नेहरू नगर मध्ये दलित वस्ती सुधारणा अतंर्गत कामे फक्त कागदावरच केली जातात का...?
या वेळी मा. रोहित कांबळे ( मातंग एकता आंदोलन माढा तालुकाध्यक्ष), मा. आकाश लांडे ( विधानसभा अध्यक्ष करमाळा-माढा) , मा. अमन कांबळे ( मातंग एकता आंदोलन कुर्डुवाडी शहराध्यक्ष) , मा. ओंकार चौधरी (कुर्डुवाडी शहराध्यक्ष) , मा. राजेंद्र भिसे ( वाहतूक सेना कुर्डुवाडी शहराध्यक्ष) मा. गणेश खिलारे ( नेहरू नगर कुर्डुवाडी शाखा अध्यक्ष) , मा. अमोल घोडके ( नेहरू नगर मार्गदर्शक) तसेच सचिन कांबळे, संदीप मोरे, आशिष अरसुले, अजय खिलारे , सुधीर कांबळे, विजय कांबळे, आनंद खिलारे, सुरज अस्वरे, विशाल कांबळे तसेच नेहरू नगर मधील नागरिक समस्या घेऊन उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा