Breaking

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक -राजेश पवार*



*ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक -राजेश पवार*


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड दि 27 सप्टेंबर 2021 आपण ज्या समाजात  जन्मलो त्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेचे मूर्तिमंत उदाहरण जणू समाजापुढे ठेवले
आज मराठा सेवा संघ नांदेड अंतर्गत विद्यार्थी दत्तक कक्षाच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री राजेश पवार साहेब यांनी नवा मोंढा येथे होणाऱ्या शंभर मुलींच्या वसतिगृहाला आर्थिक मदत केलीच आहे तर आज त्याच वसतिगृहातील ५ मुलीं दत्तक घेण्याचे वचन दिले .त्या ५ मुलीच्या जेवणाचा व  शिक्षणाचा सर्व खर्च  शिक्षण  पूर्ण  होईपर्यंत करण्याचा  निर्णय त्यांनी घेतला  आहे .तसेच  मागील तीन वर्षांपासून मुदखेड येथील  चि.यश कैलासराव सूर्यवंशी यांच्यावर वडीलाचे आकस्मिक निधन  झाल्यामुळे पुढील शिक्षण सोडण्याची वेळ आली होती.परंतु कोणितरी ही बातमी आ.पवार यांना  सांगितली त्यावेळी आ पवार यांनी सदरील मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली . त्याची B.tech ची दरवर्षी ८६७००/- प्रमाणे फिस भरली होती . याही वर्षी ८६७००/-रु.चा धनादेश SGGS महाविद्यालयाच्या नावे सदरील विद्यार्थ्याला मराठा सेवा संघा चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री कामाजी पवार साहेब , कृषी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सोपान मामा क्षिरसागर ,मराठा मुलांच्या वस्तीगृहाचे अध्यक्ष श्री मधुकर मामा देशमुख , संघाचे मार्गदर्शक श्री शे.रा .पाटील साहेब ,मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष पंडितराव कदम, जिल्हा कोषाध्यक्ष पि.के. कदम, जिल्हा उपाध्यक्ष रवी ढगे यांच्या हस्ते धनादेश  सदरील विध्यार्थ्यांला त्याच्या आईच्या उपस्थित  माननीय आमदार राजेश पवार साहेब यांनी सुपुर्द केला.तसेच सर्व समाजाबरोबर मराठा समाजासाठीही सेवा करण्यासाठी  मी सदैव तयार आहे असे मनोगत व्यक्त केले. माझ्या वडिलांनी कै.संभाजी पवार साहेब यांनी गरीब होतकरू गरिबी मुळे शिक्षण पूर्ण करण्यात अडचणी असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी घेण्याची ही परंपरा पवार कुटुंब  चालूच ठेवेन असे सांगितले . ग्रामीण भागातील मुलींना  शैक्षणिक  सुविधा पुरविणे काळाची गरज आहे नुकताच केंद्रीय लोक सेवा आयोगाचा निकाल जाहीर करण्यात आला यात चांगला निकाल दिसत असून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मूल व मुली यशस्वी झाल्याचे दिसत आहे याच धर्तीवर लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी मुलांचे भव्य सत्कार आयोजित  करून त्यांचे अनुभव सर्वांना ऐकण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असेही मत व्यक्त केले .दरवर्षी सर्व धर्मीय ,सर्व जातीय विवाह सोहळे  एकत्रितपणे साजरे करण्याचे सांगितले .त्यामुळे समाजाला हातभार लागेल तसेच अनाठायी खर्चही वाचेल आणी सामाजिक समरसता कायम राहील असे सांगितले . यावेळी त्यांचे  मराठा सेवा संघ महाराष्ट्र च्या वतीने ग्रंथ व दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला. या त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होताना दिसत आहे.सदरील बैठकीचे नियोजन सुनील शिंदे ,सुनील पवार यांनी केले होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा