Breaking

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

डिंभे माणिकडोह बोगदा प्रश्नी घनश्याम शेलारांची व्यर्थ लुडबुड-बाळासाहेब नाहाटा



डिंभे माणिकडोह बोगदा प्रश्नी घनश्याम शेलारांची व्यर्थ लुडबुड-बाळासाहेब नाहाटा

श्रीगोंदा-नितीन रोही,

देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची डिंभे माणिकडोह बोगदा प्रश्नी दि.६ सप्टेंबर रोजी पुणे येथे भेट घेऊन डींभे माणिकडोह बोगदा प्रश्नी 
लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती.त्यावर पवार साहेब यांनी मी या प्रश्नी लक्ष घालतो व या प्रश्नी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून या संदर्भात पुढील कारवाई सुरू करु असे त्यांनी सांगितले होते.त्यावर काल दि.१६ सप्टेंबर रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर प्राथमिक चर्चेसाठी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीमध्ये देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब,राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील साहेब,दिलीप वळसे पाटील साहेब,पारनेर आमदार निलेश लंके कर्जत आमदार रोहित पवार, जुन्नरचे आमदार अतुल बनके हे उपस्थित होते. शारिरीक प्रकृती ठीक नसल्या कारणामुळे श्रीगोंदा तालुक्याचे प्रतिनिधी बबनराव पाचपुते अनुपस्थित होते. ही बैठक फक्त लोकप्रतिनिधी व अधिकारी या बैठकीमध्ये पवार साहेब यांनी कुकडी प्रकल्प संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व संबंधित अधिकाऱ्यांकडून कुकडी प्रकल्पाची एकूण परिस्थिती, जलसिंचन क्षमता व वाढलेली पाण्याची गरज पाहता दरवर्षी उन्हाळ्यात चारही तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. त्यामुळे दरवर्षी उभे पिके जळून प्रचंड आर्थिक नुकसान होते.त्यामुळे डिंभे ते माणिकडोह बोगदा करून कुकडी प्रकल्पाचे सिंचन क्षमता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.असे असताना या बैठकीचा आणि घनश्याम शेलार यांचा काडीचा संबंध नसताना, आमंत्रण नसताना देखील ते फक्त फोटो सेशनसाठी बैठकीमध्ये उपस्थित होते.काल झालेल्या बैठकीनंतर कर्जत,पारनेर,करमाळा या तालुक्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेतली नाही.परंतू शेलार यांनी  या बैठकीचे श्रेय घेण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन जो खटाटोप केला हा प्रकार अतिशय लांच्छनास्पद आहे.पायात पाय घालणे व श्रेयासाठी पत्रकबाजी करून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेणे हा शेलारांचा जुनाच धंदा आहे.स्वत: कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य असून ओव्हरफ्लोचे पाणी अर्ध्यावर बंद झाले त्यावेळी शेलार शांत का बसले.ते फक्त मिरवण्यापुरते सल्लागार समितीचे सदस्य आहेत.त्यांच्या या पदाचा तालुक्याला काडीचाही उपयोग नाही.तरी शेलारांनी हि बीनबुडाची पत्रकार बाजी थांबवावी अन्यथा तालुक्यातील जनता त्यांना कदापिही माफ करणार नाही. अशी घणाघाती टीका बाळासाहेब नाहाटा(संचालक-राज्य बाजार समिती महासंघ पुणे)
यांनी केली.


चौकट-कालवा सल्लागार समितीचे पद मिळाल्यापासून शेलार हवेत आहेत. डिंभे ते माणिकडोह बोगदा प्रश्नी आम्ही पवार साहेबांना विनंती केली होती. त्यावर बैठक लागली. बाबासाहेब भोस व आम्ही तसेच कर्जत-करमाळा-पारनेर मधील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी लवकरच पुन्हा भेटणार आहोत.

फोटो,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा