*उत्तरप्रदेशातील लखीमपूर खीर शेतकरी हत्याकांडाचा करमाळा महाविकासआघाडी कडून निषेध*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खीर शेतकरी हत्याकांडाच्या निषधार्थ महाविकास आघाडी सरकारकडून घोषित केलेल्या बंदला करमाळा महाविकासआघाडी कडून करमाळा बाजारपेठ बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती,बाजापेठा बंद स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्या व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खीर येथील आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या मुलाने आठ शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले आहे त्याचा निषेध नोंदवत आरोपींवर त्वरित कठोर कारवाई व्हावी,केंद्रीय कृषिराज्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा तसेच केंद्र सरकारने पारित केलेले काळे कृषी विधेयक मागे घेण्यात यावे ही मागणी करमाळा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या वतीने केरण्यात आली.यासंदर्भात प्रशासनास निवेदन देण्यात आले.यावेळी करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभजवराजे जगताप,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे,शहराध्यक्ष शिवराज जगताप,राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर काका लावंड,शिवसेना नेते संजय शिंदे,शहराध्यक्ष प्रवीण कटारिया,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गौरव झांझुर्णे,जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शरद नेटके,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे,तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,शहराध्यक्ष ओंकार पलंगे,महेश मोरे,राष्ट्रवादी किसान सभेचे तालुकाध्यक्ष चक्रधर शिंदे,कार्याध्यक्ष सचिन नलावडे,आझाद शेख,मुस्तकीम पठाण यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,या बंदला व्यापारी,शेतकरी,विद्यालये,
महाविद्यालयासह सर्वच स्तरातील लोकांनी उत्स्फूर्तपणे पाठींबा देत बंद यशस्वी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा