तर रस्त्यावर फिरू देणार नाही--संभाजी ब्रिगेड
संभाजी ब्रिगेड च्या वतीने अर्धापुर तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा,सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, सरसकट पिक विमा मिळाला पाहिजे,दिवसा शेतकर्यांना थ्री फेज वीज मिळाली पाहिजे,पिकविमा मिळण्यासाठीची उंबरवठा पद्धत रद्द झाली पाहिजे, वृद्ध शेतकऱ्यांना मानधन मिळाले पाहिजे या व इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने अर्धापुर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या मागण्याला शासनाने महत्व देणे गरजेचे आहे पण शासन महत्व देतांना दिसत नाही असे मत संभाजी ब्रिगेड चे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख उमाकांत उफाडे यांनी मत व्यक्त केले.हेक्टरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी शासनाने देऊ केले ती शेतकऱ्यांची थट्टा करण्यासाठी आहे.शेतकर्यांच्या हक्कासाठी आम्ही तुकोबारायांच्या पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तीन्ही लोकी झेंडा या म्हणीनुसार गुंड तर गुंड असे मत संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी मत व्यक्त केले.येत्या काही दिवसात हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई दिली नाही तर राजकीय नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांनी मत व्यक्त केले.शेतकर्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शाम पाटील कुशावाडीकर यांनी व्यक्त केले.शेतकर्यांची नुकसानी बहात्तर तासांच्या आत पिकविमा कंपनीला कळवायची तर मग नुकसानभरपाई पोटीची रक्कम बहात्तर तासातच मिळाली पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी मत व्यक्त केले.जवळपास पंचवीस ते बैलगाड्या या मोर्चात सहभागी होत्या, यावेळी शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.शेतकरी हिताच्या मागण्यांणी परिसर दणाणुन गेला होता.यावेळी दशरथ कदम,बाला कदम, विठ्ठल भिसे, संतोष कदम, चंद्रकांत कल्याणकर, व्यंकटराव कदम, पंडीत कदम,आवधुत कदम, प्रल्हाद बंडाळे, आवधुत कदम, संभाजी कदम, अभिमन्यू कदम,ज्ञानोबा कदम ,विश्वांभर कदम यांच्या सह हजारो शेतकरी मोर्चात उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा