Breaking

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

जिल्हा बँकेच्या विविध कर्ज योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा- शैलेश कोतमीरे*


*जिल्हा बँकेच्या विविध कर्ज योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा- शैलेश कोतमीरे*



*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*


सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी तसेच ग्राहकांना विविध कर्ज योजना राबवत असून या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन बँकेचे प्रशासक शैलेश कोतमीरे यांनी केले. बँकेतर्फे कंदर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
       यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,  जिल्हा बँक शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने थेट अल्पमुदत पीक कर्ज देत आहे याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.
    तसेच संस्थेचे कर्ज वेळेतच  फेडण्याची गरज आहे.  संस्था  गावची  जीवनदायिनी असते,ती वाचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे 

  राजकीय जोडे बाहेर सोडून संस्थेचा कारभार केला तर तरच संस्था यशस्वी व मोठी होते. 
    लहान व मोठया शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी  विविध कार्यकारी संस्था टिकणे गरजेचे असल्याचे  प्रतिपादन प्रशासक श्री कोतमिरे यांनी सांगितले.
    सुमारे दोन तासाच्या भाषणात बँकेच्या योजना बँकेची परिस्थिती ,कर्ज, थकबाकी ,एन ,पी  ,ऐ, वसुली याबद्दल सविस्तर माहिती आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना सांगितली.सदर कार्यक्रम प्रसंगी बँकेमध्ये 68 लाखाच्या ठेवी मिळाल्या.
    प्रारंभी बँकेचे पालक अधिकारी जयंत पाटील यांनी स्वागत केले.यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून ग्राहकांनी आपल्या ठेवी जास्तीत जास्त प्रमाणात जिल्हा बँकेतच ठेवाव्यात. बँकेचे कर्मचारी ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
   प्रास्ताविक बँकेचे सहा व्यवस्थापक श्री दुलंगे यांनी केले .
   प्रशासक श्री कोतमिरे साहेब यांचा सत्कार सर्व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सचिव तसेच ग्रामपंचायत चे सरपंच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनुक्रमे  नवनाथ शिंदे ,  नानासाहेब लोकरे  नवनाथ भांगे मालक यांनी केला.
               प्रसंगी कंदर सोसायटीचे चेअरमन  गरड व माजी चेअरमन अण्णासाहेब पवार यांनी आपले विचार मांडले.
      आभार ऍड कदम यांनी मानले.
              
       कंदर परिसरातील नवनाथ शिंदे , नवनाथ भांगे मालक, नानासाहेब लोकरे, हरिभाऊ गरड, बँकेचे शशी भाऊ शिंदे , श्री वरपे,  अण्णासाहेब पवार  , वैजनाथ कदम, माधव दादा साळुंखे, सचिव नवनाथ चौधरी यांच्यासह अनेक  अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. 
   कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाखाधिकारी  नानासाहेब गायकवाड व पालक अधिकारी जयंत पाटील यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा