Breaking

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आमसभा आमदारांनी आमसभा व ग्रामसभा घेण्याची शहाजी ठोसर यांची मागणी*


*तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आमसभा आमदारांनी आमसभा  व ग्रामसभा घेण्याची शहाजी ठोसर यांची मागणी*



*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

कोरोना काळात प्रलंबित असलेली आमसभा तसेच गावपातळीवर ग्रामसभा घेऊन तालुक्याच्या आमदारांनी जनतेच्या समस्या सोडवण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष शहाजी ठोसर यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.
      यात त्यांनी म्हटले आहे की,तालुक्याच्या जनतेला  प्रत्येक शासकीय कार्यालयात अडचणीचा सामना करावा लागत आहे. अधिकारी मन मानेल असे वागत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमसभा घेवून तालुक्यातील खराब  रस्ते, पिण्याच्या पाण्याची, शेतकऱ्यांचा विज पुरवठा,पंतप्रधान घरकुल योजना,रमाई घरकुल योजना  वाळू अभावी बंद आहेत, प्रतेक कार्यालयात रिक्त जागा भरल्या नाहीत त्यामुळे कामे होत नाहीत.आरोग्याचा मोठा प्रश्न आहे.
     यासर्व बाबी लक्षात घेता जनतेच्या प्रश्नाला वाच्या फोडण्यासाठी व अधिकाऱ्यांची बेबंद शाही बंद करण्या साठी आमसभा ह्या महिन्यात घ्यावी. अशी मागणी शहाजी ठोसर यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा