*राजेश्वर हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त 77 जणांचे रक्तदान*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
करमाळा तालुक्यातील राजुरी येथे राजेश्वर हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त तसेच दिपावलीच्या निमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न झाले. यात 77 जणांनी रक्तदान केले.
राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रुग्णाला वाचविण्यासाठी रक्ताची अंत्यत गरज असते. रक्त कुठल्याही प्रयोग शाळेत तयार करता येत नाही त्यामुळे रक्तदान करून रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करणे गरजेचे असते. त्यामुळे सामाजिक बांधीलकीतून हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवत असल्याचे हॉस्पिटलचे संस्थापक डॉ अमोल दुरंदे यांनी दिली . गेल्या 11 वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बार्शी येथील श्री भगवंत ब्लड बँक यांनी रक्तसंकलन केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ.सौ. विद्या दुरंदे, डॉ. अमोल दुरंदे, संतोष गदादे, प्रवीण दुरंदे, गणेश दुरंदे यांनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा