Breaking

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

पिंपळनेर डीसीसी बँकअपहार प्रकरणातील खातेदारांना पैसे परत मिळतील.......दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल... शैलेश कोतमिरे



पिंपळनेर डीसीसी बँकअपहार प्रकरणातील  खातेदारांना पैसे परत मिळतील.......
दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल...... शैलेश कोतमिरे


 बेंबळे। प्रतिनिधी AJ 24 Taas news Maharashtra
         

                            माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत झालेल्या अपहार प्रकरणातील संबंधित खातेदारांचे सर्व पैसे त्यांना परत मिळतील, तसेच ज्या कोणी हा भ्रष्ट उद्योग करून खातेदारांची फसवणूक केलेली आहे त्यांची कसून चौकशी होऊन त्यांना कठोर शासन करण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये, बँकेवर पूर्ण विश्वास ठेवावा असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी पिंपळनेर येथे नागरिकांशी बोलताना केले आहे. दरम्यान गुरुवार दिनांक 25 पासून  संबंधीत खातेदारांचे पैसे परत करण्याच्या सूचना कोतमिरे यांनी अधिकार्‍यांना जागेवरच दिल्या आहेत.
              वृत्तांत असा की पिंपळनेर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतून, खात्यावरील पैसे परस्पर हडप झाल्याचा प्रकार उघडकीस येताच या परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. हे वृत्त पसरताच परीसरातील अनाथ, अपंग, दिव्यांग ,विधवा, मजूर, शेतकरी व इतर खातेदारांनी आपला बँक बॅलन्स तपासून घेण्यासाठी व पैसे परत काढण्यासाठी बँकेत एकच गर्दी केली होती. त्यानंतर कांही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बँकेत येऊन खातेदारांना पूर्ण विश्वास देवून, आम्ही चौकशी करतो आपण काळजी करू नका,  आपल्या पैशाची  व्यवस्था होईल असे खातेदारांना सांगितले . दरम्यान या अनुषंगाने दीडशे ते दोनशे गावकऱ्यांनी याच प्रकरणाचे एक निवेदन बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांना पाठवून बँकेस भेट देण्याची आग्रही विनंती केली होती.
 यानुसार गुरुवारी पिंपळनेर बँक शाखेत नागरिकांशी चर्चा करताना कोथमिरे म्हणाले की, विश्वास ठेवा कोणाचा एक रुपया देखील ठेवला जाणार नाही, सर्व संबंधितांचे पैसे दिले जातील .आमचे दुर्दैव आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक दृष्ट्या मोठ्या अडचणीत असताना, आम्ही विश्वास ठेवलेल्या काही व्यक्तीनीच असे भ्रष्ट गैर कृत्य केले आहे ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी बाब असून दोषी व्यक्तीची मुळीच गय केली जाणार नाही हे आपणास भविष्यात दिसेलच.  उपस्थित नागरिकांनी याप्रसंगी सांगितले की पैशाचे अपहरण होण्याचा प्रकार मागील तीन ते चार वर्षापासून होत असावा असे वाटते, कारण श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, अंध, अपंग, विधवा, गरीब, अडाणी, मजूर अशा व्यक्तींची पासबुके कधीच भरून दिली जात नाहीत व त्यांच्या खात्यावरील व तसेच मयत व्यक्तींच्या खात्यावरील देखील पैसे गायब झाले आहेत. कांही रुपया पासून सुरू झालेला हा अपहार आता लाखो रुपये पर्यंत पोहोचलेला असल्यामुळे हे प्रकरण आता उघडकीस आले आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता बँक अधिकार्यांनी संबंधितांचे पैसे परत करून व दोषी व्यक्तीला कठोर शासन करून नागरिकांना दिलासा द्यावा ही आपेक्षा.
********************************************

लाखो रुपयांच्या ठेवी गायब......

              पिंपळनेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवलेल्या लाखो रुपयांच्या ठेवी गायब झाल्याचे दिसून येत आहे. खातेदारांच्याकडे पैसे भरलेल्या पावत्या व तसेच बँकेचे ठेव रकमेची सर्टिफिकेट्स आहेत, परंतु एफडी च्या सर्टिफिकेट वरील नंबर कॉम्प्युटर वरती टाकताच काहीच दाखवलं जात नाही , सर्व काही शून्य शून्य दिसत आहे, त्यामुळे अनेक ठेवीदार अतिशय घाबरून गेले आहेत.  फिक्स डिपॉझिट रकमेचा अपहार कित्येक कोटी रुपयाचा असण्याची शक्यता एका ठेवीदारांने व्यक्त केली आहे. याबाबत बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी तातडीने निर्णय घ्यावा अशी ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांची मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा