*बारामती सुपे परिसरात अवकाळी पावसाने 52 मेंढ्या मृत्यू तर हजारो रुपयांचे पिकांचे नुसकान*
सुपे: बारामती तालुक्यातील सुपे व सुपे परगणा भागातील दंडवाडी, नारोळी, कोरोळी, देऊळगाव रसाळ, कारखेल ,सोनवडी ,उंडवडी सुपे, खराडेवाडी, काळखैरेवाडी ,पानसरेवाडी आणि इतर परिसरातील शेतकरी 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर रोजी रोज होणाऱ्या अचानक हवामानात होणारा बदल आणि सतत होणारा अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे
यामध्ये कांदा, ऊस, ज्वारी, हरभरा ,गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अवकाळी पावसामुळे उभी पिके भुईसपाट झाली आहेत
तसेच शेतकऱ्यांची जनावरे गारठ्यामुळे शेळ्या व मेंढ्या मृत
झाल्या कुतवळवाडी 10 मेंढ्या, व चांदगुडेवाडी 20 , नारोळी 8, पानसरेवाडी 9, वढाणे 4 मेंढ्या व 1 शेळी काळखैरेवाडी 3 मेंढ्या याप्रमाणे शेतकरी जनावरांचे गारठुन मृत पावल्याचा पाठपुरावा होत आहे
यावर्षी होणारा अवकाळी पाऊस आणि रोगट वातावरण व गारठ्याचे प्रमाण पिकांवर तसेच जनावरांवर जास्त प्रमाणात परिणाम झाला आहे यामुळे यंदा शेतकरी वर्गास सरासरी उत्पन्न मिळणार नाही असे चित्र प्रभावित होत आहे
तरी शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकरी वर्गाची मागणी होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा