Breaking

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

नीरा भीमा कारखान्याचे मंगळवारी ५०३० मे.टनाचे उच्चांकी गाळप.. **हर्षवर्धन पाटील यांचेकडून अभिनंदन.इंदापूर प्रतिनिधी - आदित्य बोराटे



*नीरा भीमा कारखान्याचे मंगळवारी ५०३० मे.टनाचे उच्चांकी गाळप..
 **हर्षवर्धन पाटील यांचेकडून अभिनंदन.

इंदापूर प्रतिनिधी - आदित्य बोराटे

        शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२१-२२ च्या २१ व्या गळीत हंगामामध्ये मंगळवारी (दि.२१ डिसेंबर) एका दिवसामध्ये उच्चांकी ५०३० मे.टन ऊसाचे गाळप करून अभिमानास्पद कामगिरी केली आहे,अशी माहीती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी दि.२२ डिसेंबर रोजी दिली.
           
     नीरा भीमा कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी ३५०० मे.टन एवढी असताना एका दिवसामध्ये उच्चांकी ५०३० मे.टन गाळप पूर्ण केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, ऊस वाहतूकदार कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले. चालु हंगामात कारखान्याने आज अखेर २लाख ७१ हजार मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत. कारखान्याचे ' कृषीरत्न ' हे सेंद्रिय खत  उधारीवर विक्रीसाठी उपलब्ध आहे, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले. चालू हंगामात कारखाना 7 लाख मे.टन उसाचे गाळप पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

     याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील उपस्थित होते.
___________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा