*राष्ट्रीय सेवा योजनेच्या वनराई बंधाऱ्याचा उपक्रम यशस्वी*
तुळजापूर,दि.१५, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग ज्युनिअर कॉलेजच्या स्वंयसेवकांनी तुळजापूर खूर्द येथे चार वनराई बंधारे यशस्वीपणे निर्माण केले.महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमातंर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा वनराई बंधाऱ्याचा प्रकल्प हाती घेऊन तो पूर्णत्वास नेला.मराठवाडा क्षेत्र कमी पर्ज्यन्यमानाचे असल्याने भविष्यात या वनराई बंधाऱ्याचा परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे उपयोग होणार आहे,सदर प्रकल्पासाठी महाविद्यालयातील ४७ स्वंयसेवकांनी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व योग्य ती खबरदारी घेऊन आपला सहभाग नोंदविला.प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.वागदकर एस.पी ,प्रा.वसावे एम.जी, तसेच प्रा धनंजय लोंढे,प्रा.आशपाक आतार,प्रा.जे.बी.क्षीरसागर,प्रा.श्रीमती एस.एस.कदम,प्रा.मगरे एम.एन,प्रा.एकदंते एन.पी प्रा.विजयसिंह देशमुख यांनी सहकार्य केले.सदर प्रकल्प निर्मितीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम मणेर यांचे सुयोग्य मार्गदर्शन लाभले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापुर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा