*सक्तीची वीजबिल वसुली थांबवा,अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार- शंकर पोळ*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- aj24taas news Maharashtra-साठी अतुल वारे पाटील*
संभाजी ब्रिगेड नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून करमाळा तालुक्यात वीज वितरण कंपनीकडून सक्तीने वीजबिल वसुली करण्यात येत आहे. ही थांबवावी अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल असा स्पष्ट इशारा संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ यांनी दिला आहे.
सदर प्रतिनिधीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्यातील शेतकरी दुष्काळ, अतिवृष्टी आदींमुळे पूर्णपणे भरडला गेला आहे. यातच शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल दराने व्यापारी खरेदी करत आहे. आस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी देशोधडीला जात असताना हे निष्क्रिय सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शेतमालाचे बाजार पाडून शेतकऱ्यांना उध्वस्त करत आहे. त्यामुळेच संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असून सध्या सुरू असलेली सक्तीची वीजबिल वसुली न थांबवल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,सचिव सचिन शिंदे,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे, शंकर
,जिल्हा संघटक गणेश सव्वाशे, तालुका सचिव गणेश डोके,कार्याध्यक्ष राजेश ननवरे, विशाल पाटील,हनुमंत घोरपडे, करमाळा शहराध्यक्ष वैभव माने,जालिंदर माने,दत्तात्रय अरणे, अजित कांडेकर, आनंद इंदलकर, दत्ता नलवडे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा