*प्रधानमंत्री पीकविमा योजनेची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे तुळजापूर तहसीलदार मार्फत देशाचे पंतप्रधान यांना निवेदन*
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,तुळजापूर तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोंबर 2021 या महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले होते,या नुकसानीची टक्केवारी ही कमीत कमी 80 टक्के व त्यापेक्षाही जास्त असताना देखील नुकसानीच्या टक्केवारीच्या तुलनेत पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरला परंतु अनेक अशिक्षित शेतकऱ्यांनी शेतातील मोक्याच्या ठिकाणी जाऊन अँप द्वारे नुकसान पिकांची फोटो प्रतिमा अपलोड केली नाही, तर अनेक अशिक्षित शेतकऱ्यांजवळ मोबाईलच नसल्यामुळे विम्यापासून नुकसान होऊन देखील वंचित राहिले आहेत. तसेच पीकविमा कंपनीने गेल्या वर्षी निकषाचा आधार घेवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली होती. परंतू यावेळी पुन्हा केंद्राच्या चुकीच्या नोटिफिकेशनचा आधार घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही न भरुन येणारे नुकसान झालेले आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल या आशेपोटी शेतकरी राजा खुश होता, परंतु सुरु केलेली ही प्रधानमंत्री पिकविमा योजना निव्वळ पोकळ ठरली असून पिकविम्याच्या रक्कमेपोटी या योजनेच्या माध्यमातून केवळ पिकविमा कंपनीला पोसण्याचे काम होत असल्याचे दिसून येत आहे.
तेंव्हा लवकरात लवकर पिकविम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावी, शेतकऱ्यांचें होणारे नुकसान लक्षात घेता संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. आहे.यावेळी शिवश्री महादेव मगर,शिवश्री संजय बनसोडे. शिवश्री अमित कदम, शिवश्री बालाजी मगर, शिवश्री विनोद मगर, शिवश्री लक्ष्मण शिंदे,यांच्यासह संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा