*जागतिक मानवी हक्क दिना निमित्त मुख्यमंत्र्यांना निवेदन*
कळंब दि.१०, डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त १०डिसेबर रोजी येथील उपविभागीय कार्यालय व पोलीस ठाणे यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना लाल पॅंथर,मानवहित लोकशाही पक्ष, महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.या वेळी दिलेल्या निवेदनात मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय पड गायरान जमीन , वन जमीन,व गावठाण वरील निवासीअतिक्रमणे नावे करा, मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमाती,अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार अन्याय ग्रस्त कुटुंबांना आर्थिक सहकार्य करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.महागाई निर्देशांकानुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, कोरोनाने विधवा झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.या वेळी लाल पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड भाई बजरंग ताटे, मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे, महाराष्ट्र क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष समाधान भाऊ डोंगरे, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सरचिटणीस सुभाष थोरात, सामाजिक कार्यकर्ते भीमराव कांबळे,लाल पॅथरच्या जिल्हाध्यक्षा माया शिंदे, संगीत बिक्कड, महादेव शिंदे, बजरंग धावारे,भारत कदम,सुनील गायकवाड यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा