Breaking

रविवार, ३० जानेवारी, २०२२

हवामानाच्या बदलामुळे माढा तालुक्यात फळपिकावर परिणाम*



*हवामानाच्या बदलामुळे माढा तालुक्यात फळपिकावर परिणाम*

*AJ 24 Taas News माढा तालुका प्रतिनिधी: भारत जगताप


 उत्तर भारतातून आलेल्या थंडीच्या लाटेमुळे राज्यातील हवामानात बदल झाला आहे माढा तालुक्यात सध्या कडाक्याची थंडी ची लाट सुरू आहे यामुळे शेतकऱ्यांच्या फळपिकावर रोग पडत असून उत्पादनावर परिणाम होत आहे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड देण्यास भाग पडावे लागत आहे



शेतातील भाजीपाल्याची पिके फळबागा यांच्या वरती अनेक रोग पडत आहेत शेतकरी अनेक प्रकारच्या फवारण्या करून पिके वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे  हवामानाच्या बदलामुळे अनेक संकटे शेतकऱ्यांना भेडसावत आहेत अवकाळी पावसाचा व निसर्गाचा अनिश्चित पणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे गेल्या वर्षीच्या पेक्शा चालू वर्षी औषधे मजुरी खते वाढले आहेत यामुळे खूप प्रयत्न करून जोपासलेली पिके कशी सांभाळायची असा प्रश्न शेतकऱ्यांना उभा आहे निसर्गाच्या या खराब हवामानामुळे द्राक्ष पिकावर अनेक प्रकारचे रोग पडत आहेत 


द्राक्षांच्या झाडावर करपा, भुरी असे रोग पडून झाडे खराब होत आहेत याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत आहे अशा खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक हानी होत आहे त्यामुळे शेतकरी हताश होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा