Breaking

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

श्री. तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित गोकुळ शुगरच्या पहिल्या गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ.


श्री. तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित गोकुळ शुगरच्या पहिल्या गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ.


 AJ 24taas News साठी /प्रतिनिधी अजित चव्हाण


   नळदुर्ग ऊस उत्पादक शेतकरी, कामगार ऊसतोड मजुर यांच्या हक्काचा श्री तुळजाभवानी साखर कारखाना आहे. शेतकऱ्यांनी योग्य भाव मिळण्यासाठी परिपक्व ऊस घालावे. त्यामुळे रिकव्हरी चांगली येईल. असे सांगुन संचालकांनी ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे वेळेवर पैसे द्यावे. त्याचबरोबर कारखान्याचे भाडे बँकेस वेळेवर भरावे. जेणेकरुन बँकेची नोटीस निघणार नाही. त्याकरिता कारखाना सुस्थितीत चालण्यासाठी व शेतकरी कामगार यांच्या हितासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दि. 26 जानेवारी रोजी नळदुर्ग येथिल श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित गोकुळ शुगरच्या पहिल्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी गव्हाणीत ऊसाची मोळी टाकण्या प्रसंगी केले.

     बुधवार दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन तुळजाभवानी साखर कारखाना संचलित गोकुळ शुगर इंडस्ट्रीजच्या पहिल्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी काट्याचे पुजन श्री शिवाचार्य महाराज, महंत श्री तुकोजी बुवा महाराज, महंत श्री मावजीनाथ बुवा महाराज, महंत श्री ईच्छागिरी बुवा महाराज, महंत व्यंकटारण्य बवा महाराज, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते पुजन करुन गव्हाणीत मोळी टाकण्यात आली.
    यावेळी बोलताना माजी मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, या भागातील शेतकऱ्यांची व कामगारांची समस्या सोडविण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून प्रयत्न सुरु होते. त्यास सर्वांचे सहकार्य लाभले. श्री तुळजाभवानी साखर कारखाना कर्जमुक्त व्हावा यासाठी गोकुळ शुगरने जास्त भाडे देवुन १५ वर्ष भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतला आहे. शेतकरी , मजुर कामगार याना योग्य मोबदला मिळाला  पाहिजे. पुर्वी ज्या चुका झाले ते यापुढे होणार नाही. याची खबरदारी घेण्याची गरज आहे. याप्रसंगी महंत महाराज यांनी कारखाना आता अडचणीतुन बाहेर पडला असुन बंद होणार नाही असा आर्शीवाद दिला.
   या कार्यक्रमास तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण, गोकुळ शुगर चे चेअरमन दत्ता शिंदे, जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ शिदे, जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच रामचंद्र आलुरे, बालाघाट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास बोरगावकर, कारखान्याचे संस्थापक संचालक अशोक मगर, अख्तर काझी,  कपिल शिंदे , माजी जि.प. सदस्य मुकूंद डोंगरे, पंडित जोकार , काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा सुभद्रा मुळे, नळदुर्ग शहर महिला अध्यक्षा कल्पना गायकवाड, माजी नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अंहकारी , शहबाज काझी , इमाम शेख , सोसायटीचे चेअरमन सुरेश हजारे , सामाजिक कार्यकर्ते सुनिल बनसोडे , बालाजी मोकाशे, अशोक मगर ,  सरपंच अशोक पाटील , प्रकाश चव्हाण , प्रशांत नवगिरे , सिद्राम मुळे , कृष्णात मोरे , माजी सरपंच  सरिता मोकाशे , रणवीर चव्हाण , आभिजित चव्हाण , अझर जहागिरदार , महंत वसंत रामदासी , अमर नरवडे , संगाप्पा हागलगुंडे, प्रशांत नवगिरे , कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण यानी केले. सुत्रसंचालन माजी नगरसेवक विनायक अंहकारी यानी तर आभार कार्यकारी संचालक विकास भोसले यानी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा