आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मिळालेले आत्मिक समाधान खूप मोलाचे - राजश्री पाटील
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड : संपूर्ण परिवाराचा गाडा पुढे नेणाऱ्या घरातील महिलेचे आरोग्य अबाधित राहिले तरच संसार सुखाचा आणि आरोग्यदायी राहतो या एकमेव उद्देशाने महिलांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यातून मिळणारे आत्मिक समाधान खूप मोलाचे आहे .असे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी केले . कळमनुरी तालुक्यातील सुकळी ( विर ) येथे गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी व्यासपीठावर गोदावरी फाउंडेशनचे सचिव धनंजय तांबेकर , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर,डॉ.दत्ता काळे,सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे,शिवसेना सर्कलप्रमुख शिवाजी उर्फ पप्पू अडकिणे,माजी युवासेना जिल्हाप्रमुख बाजीराव सवंडकर,सर्कल प्रमुख पप्पू विर , यांची प्रमुख उपस्थिती होती .
आयोजित आरोग्य शिबिरात बोलताना राजश्री पाटील म्हणाल्या कि, महिला सक्षमीकरणावर आपण नेहमी जोर देऊन बोलत असतो परंतु कुटुंबात पतीच्या नंतर संपूर्ण परिवाराचा गाडा हाकणाऱ्या महिलेच्या आरोग्याविषयी कधीच कुठे बोलले जात नाही . संपूर्ण कुटुंब सांभाळणाऱ्या स्त्रीच्या आरोग्याचा सुद्धा त्याच दृष्टीकोनातून विचार झाला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मोठ्या कुटुंबात अनेकवेळा महिला सुद्धा आजाराकडे दुर्लक्ष करतात आणि याचे दूरगामी परिणाम त्यांच्या शरीरावर झालेले दिसतात.गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने आज आयोजित केलेले आरोग्य शिबीर हे कोणत्याही राजकीय उद्देशापोटी नसून अश्या सामाजिक कार्यक्रमातून मिळणारे आत्मिक समाधान खूप मोलाचे आहे असे मला वाटते. ग्रामीण भागातील महिला अर्थसाक्षर झाल्या पाहिजेत, तरुण युवकांना रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीकोनातून सुद्धा गोदावरी फाऊंडेशन कार्य करत असते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात गोदावरी फाउंडेशनचे सचिव धनंजय तांबेकर यांनी संस्था घेत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली त्यासोबतच सुकळी येथे फक्त आरोग्य शिबिर घेऊन न थांबता गोदावरी फाउंडेशन विधवा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराला मधुबापू अडकिणे , शिवाजी गावंडे, रेडगावचे सरपंच धनंजय पवार , सरपंच डॉ. शेख इसाक , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर सावंत , समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुरज बोडखे,डॉ.सौ भाग्यश्री पाटील डॉ. अनिल देवसरकर,डॉ.राजकुमार पवार, डॉ. गजानन शेंडेराव, डॉ.विनोद अतकूरकर, डॉ मोहसीन शेख, डॉ. अनिल मात्रे, डॉ. दत्ता हाके, डॉ. नितीन हाके,यांनी रुग्णांची तपासणी करून निदान केले. तर यावेळी तलाठी रामेश्वर गिरी, मुख्याध्यापक इंगोले सर, प. स. सदस्य आशाबाई धुमाळे , उपसरपंच सौ. मिनाक्षी धुमाळे, पोलीस पाटील नर्मदाबाई मात्रे , तंटामुक्ती अध्यक्ष भगवान विर , सौ. मनिषा शितळे , ज्योती सरकुंडे, कौश्यल्याबाई धुमाळे, गंगाधर गवारे, संगिताबाई विर , सुनिता सरकुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संत मुख्याध्यापक बंडू शितळे यांनी केले आणि आभार डॉ सुरज बोडखे यांनी मानले . यावेळी सावित्रीबाई फुले विधवा -निराधार महिला बचतगटाच्या वतीने राजश्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला .तसेच कोरोनाच्या काळात ग्रामस्तरावर कार्य करणाऱ्या सौ. अंकिता सोनाळे, सौ. राक्षसमारे मॅडम, अंगणवाडी सेविका प्रभावतीबाई मात्रे,वच्छाबाई हाके, धुरपतबाई मात्रे , रेणुकाबाई सरकुंडे, अपर्णा पवार, कोरोना योध्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाला शिवसैनिक सतीश नलगे , बालाजी खूपसे, बाजीराव विर , संभाजी धुमाळे, भगवान सरकुंडे, रमेश शितळे , चंद्रकांत शितळे यांच्यासह समस्त शिवसैनिक उपस्थित होते. आरोग्य शिबिरात एकूण ३३० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोदावरी फाउंडेशनचे विलास वाळकीकर, जसवंतसिंह ,संकेत कदम, शिवाजी पातळे,सोनल सुलभेवार,अमोल बुद्रूक,रंगनाथ मात्रे , मारोती पोटे, संतोष मुकाडे , विनायक मात्रे, भिमराव नलगे , मधुकर विर ,गोविंद मात्रे ,दामोधर वैद्य, आदींनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा