*उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मुख्य शाखा तुळजापूर यांच्यावतीने बँकेतील सर्व खातेदारकास केवायसी करण्याचे, शाखाधिकारी अजित उर्फ बाळासाहेब भागवत यांचे आवाहन.*
*********************************
तुळजापूर: उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मुख्यालय उस्मानाबाद शाखा तुळजापूर यांच्यावतीने बँकेतील सर्व प्रकारच्या खातेदारांना कळविण्यात येते की रिझर्व बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांच्या मार्गदर्शक सूचना नुसार बँक खाते धारकांनी केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे तरी सर्व प्रकारच्या खातेदारांकानी चालू तारखेवरील संबंधित कागदपत्रे, १.एक रंगीत फोटो,२. आधार कार्ड आवश्यक , ३.पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ रेशन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक या कागदपत्रांची पूर्तता दिनांक १५.०३.२०२२ पर्यंत नजीकच्या शाखेत समक्ष सादर करावे अन्यथा आपल्या खात्यावरील व्यवहार दि.०१.०४.२०२२ पासून बंद होतील याची नोंद घ्यावी असे आवाहन दि उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, मुख्यालय उस्मानाबाद शाखा, तुळजापूर मेन, शाखाअधिकारी, अजित उर्फ बाळासाहेब भागवत,यांच्या कडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा