*छत्रपती शिवाजी महाराज रयतेची कणव असणारे राजे- प्राचार्य डॉ एस एम मणेर*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर,दि.१९, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ मणेर म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे शेतकऱ्यांचे व स्त्रीयांचे रक्षणकर्ते होते, आपल्या सैनिकांना त्यावेळी शिवरायांनी आदेश दिला होता की,मोहिमेवर जात असताना सैन्यांनी आपले अश्वदल शेतकऱ्यांच्या पिकातुन घेऊन जायचे नाही, किंवा महिलांवर अन्याय करणाऱ्या अपराध्यांना कठोर शासन त्यांनी केले,स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी मावळे सदोदीत तत्पर असत, रयतेच्या प्रति पित्यासमान माया असणारे ते जगातील एकमेव राजे होय, अशाप्रकारे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा आशपाक आतार यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा