*तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु) येथे महाराष्ट्र विद्यालय येथील दहावी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु) येथील महाराष्ट्र विद्यालय, आज दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बिजनवाडी गावचे सरपंच श्री दत्ता काळदाते आणि एमपीएससी परीक्षा पात्रताधारक शाळेचा विद्यार्थी अभिमान माने हे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अनिल सोमवंशी, सहशिक्षक रवींद्र पाटील, तानाजी म्हेत्रे, भाऊसाहेब पांढरे, गवळी यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांची झालेली हेळसांड तत्संबंधी विचार पाहुण्यांनी भाषणातून व्यक्त केले. शाळा सोडून जाताना जड अंतकरणातून विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शिक्षक तानाजी म्हेत्रे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा