*बारावीच्या परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू, उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
बारावीच्या परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटन उस्मानाबादेत घडली आहे तुळजापूर-नळदुर्ग या नॅशनल हायवे क्रमांक 206 वरती हा अपघात झाला, अर्जुन गोविंद राठोड असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून सदरील विद्यार्थी मोटारसायकलने बोरनदीवाडी येथून परीक्षेसाठी नळदुर्ग येथे निघाला होता, यादरम्यान गांधोरा पाटी जवळ आल्यानंतर कंटेनर क्र.आर.जे 32.जि.सी.0545 या वाहनाने चुकीच्या पद्धतीने चालवून मोटरसायकला जोराची धडक दिली यात अर्जुनचा जागीच मृत झाला असून घटनास्थळावरून कंटेनर चालक पळुन गेला आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे प्रक्रिया सुरू आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा